शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:50 IST

यावर्षी ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अशाच पद्धतीने आदेश दिला होता, मात्र प्रलंबित असलेल्या याचिकांवरील निर्णय हा अंतिम असेल असे स्पष्ट केले होते. परंतु, आजच्या निकालाने ओबीसी आरक्षणाचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे.

मुंबई : राज्यात २०२२ पूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत जी स्थिती होती, त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने ओबीसींच्या ३४ हजार जागा बचावल्या आहेत.

यावर्षी ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अशाच पद्धतीने आदेश दिला होता, मात्र प्रलंबित असलेल्या याचिकांवरील निर्णय हा अंतिम असेल असे स्पष्ट केले होते. परंतु, आजच्या निकालाने ओबीसी आरक्षणाचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे.राज्यात २०२२ पूर्वी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण होते. त्यानंतर नागपूर जिल्हा परिषद व इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने एकूण आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बाब समोर आली. त्यामुळे अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षणावर गदा येणार, असे चित्र निर्माण झाले होते. 

अनुसूचित जाती-जमातींसाठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये २३ टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे, तिथे ओबीसींचा आरक्षणाचा टक्का कमी होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ओबीसींमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे म्हणत अनेक ओबीसी संघटना, नेते आक्रमक झाले, आंदोलनेदेखील झाली होती. कारण, ओबीसी आरक्षणाच्या ३४ हजार जागा कमी होण्याची भीती निर्माण झाली होती.

अडथळे दूर झाले : भुजबळओबीसी आरक्षणाचे अडथळे दूर केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. भुजबळ म्हणाले की, ओबीसींचा इम्पेरिकल डाटा नाही म्हणून ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देऊ नये, अशी मागणी काही जणांनी याचिका करुन केली होती. तत्काळ इम्पेरिकल डाटा राज्य सरकारने द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले. 

सगळ्याच जिल्ह्यांत पूर्ण ओबीसी आरक्षण : मुख्यमंत्रीजुन्या आरक्षणाप्रमाणेच निवडणुका घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावेळी दिले होते. न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने तेच निर्देश नक्की झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आता सगळ्याच जिल्ह्यांत पूर्णपणे ओबीसी आरक्षण राहणार आहे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, २०२२ मध्ये जी प्रभाग रचना झाली होती, त्याप्रमाणे निवडणूक घ्या, अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने तयार केलेला हा कायदा आमच्या सरकारने रद्द केला होता. न्यायालयाने २०२२ प्रमाणे नाही, तर २०१७ प्रमाणेच निवडणुका होतील, या राज्य सरकारच्या दोन्ही बाबी मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणसहितच घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

निवडणुकीला उशीर नको म्हणून घेतला होता आक्षेपराज्य शासनाने १० जून रोजी नवीन प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. तो वॉर्डरचनेचा कार्यक्रम ११० दिवसांचा होता. मात्र यासाठी एक महिन्याचा कालावधी पुरेसा आहे. परंतु तीन ते चार महिने प्रभाग रचनेसाठी दिल्यावर निवडणुका लवकर होणार नाहीत. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, असे याचिकाकर्ते डॉ.अफसर शेख यांनी म्हणाले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणElectionनिवडणूक 2024