शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

‘फणसाड’ अभयारण्यात वाढली बिबट्यांची संख्या

By admin | Updated: May 18, 2016 03:30 IST

बिबट्या, इतर प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

आगरदांडा : दरवर्षी मे महिन्यात येणाऱ्या बुध्दपौैर्णिमेच्या आठ दिवसांपासून प्राण्यांची गणना केली जाते, असे फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सूर्यमान तडवी यांनी सांगितले. यावेळी बिबट्या, इतर प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. याप्रमाणे सांबर ३, भेकर २२, डुक्कर ५३, शेकरू १९, ससे १०, काळीमांजर ०६, लांडोर १३, रानमांजर ०८, जवादा ३, माकडे ११०, वानर २५, बिबटे १०, रानकोंबडे २८, मोर २३, घोरपड १, गरूड ६ अशी गणना झाली होती.परिसरात फणसाड अभयारण्य क्षेत्राचा विस्तार सुमारे ५४ किमी क्षेत्रावर झालेला आहे. मुरु ड, रोहा, अलिबाग तीन तालुक्याला या क्षेत्राची हद्द स्पर्श करते. नवाब सरकारने हे अरण्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून संरक्षित केलेले आहे. या अभयारण्यात वन्यजीव प्राण्यांबरोबर औषधी वनस्पती व इतर उपयोगी वृक्षांचा भरमसाट साठा उपलब्ध आहे. या अभयारण्यात बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, शेकरू, पिसोरी, ससा, कालामांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगुस, वानर, मोर, गिधाड आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असून फणसाड अभयारण्यात प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचे स्रोत २७ ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सूर्यमान तडवी यांनी दिली.अभयारण्यात जर एखाद्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले असेल तर त्याठिकाणी खड्डा करून पाणी साठवले जाते. वन्यप्राण्यांना पाणी कसे पुरविता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या मुरूड तालुक्यात दिवसाचे तापमान ३५ डिग्री सेल्सियसमध्ये आहे. कडक उन्हात पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये म्हणून जेवढे पाण्याचे स्रोत आहेत त्याची प्रत्येक दिवशी तपासणी केली जात आहे. पाणी आटले किंवा प्रवाह कमी झाला तर ताबडतोब खड्डा खणून जमेल तेवढे पाणी साचवले जात आहे. मे अखेरपर्यंत चिखलगाण, सावरट तलाव, धरणाची गाण, सावरट गाण याठिकाणी भरपूर पाणीसाठा असल्याने वन्यजीव प्राण्यांची पाण्यासाठी कोणतीही परवड होत नाही. (वार्ताहर)