शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?

By admin | Updated: August 9, 2015 02:36 IST

तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी

मुंबई : तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या पाच वर्षात एकट्या महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, मानायचे असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडवणीस सरकार आल्यानंतर ‘मेक इन इंडिया’सारख्या घोषणा सतत ऐकावयास मिळत आहेत. राज्यामध्ये गुंतवणूक आणण्याकरिता अनेक देशांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब दौरे करत आहेत, प्रत्येक दौऱ्यानंतर राज्यावर हजारो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणांचा वर्षाव पहावयास मिळतो. पण प्रत्यक्षात वास्तव वेगळेच आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉन कंपनी आणि राज्य सरकार यांच्यात पाच अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा सामजस्य करार झाल्याचे जाहीर केले. त्या संदर्भात बोलताना चव्हाण असेही म्हणाले की, गुंतवणुकीचा हा आकडा जनतेची दिशाभूल करण्याकरिता वाढवून सांगितलेला नसावा आणि खरोखरच एवढ्या प्रमाणात गुंतवणूक यावी अशी कॉंग्रेस पक्षाची अपेक्षा आहे आपल्या या म्हणण्याचे अधिक स्पष्टिकरण देताना चव्हाण म्हणाले, दोन तीन दिवसांपूर्वी याच टेरी गाऊ यांनी एका मुलाखतीमध्ये संपूर्ण भारत देशात दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील १० वर्षात करण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच सदर गुंतवणूक ही एकाच प्रकल्पात नव्हे तर अनेक सामंजस्य करारान्वये केली जाईल. म्हणजे अनेक कंपन्यांबरोबर विविध प्रकल्पांद्वारे ही गुंतवणूक नरेंद्र मोदी यांचे सरकार जर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत असेल तर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दोन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या उद्योगसमूहाचा मानस बदलला असेल तर त्याचे आपण स्वागतच करतो असेही चव्हाण म्हणाले. परंतु नरेंद्र मोदी सरकारची आणि एकंदरच भाजप सरकारची मानिसकता ही अतिरंजीत आश्वासने व प्रत्येक विषयाचे मार्केटिंग करण्याची राहिलेली आहे. २००३ पासून २०११ पर्यंत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले होते. परंतु त्यापैकी फक्त आठ टक्केच गुंतवणूक वास्तवात झाली, असा दावाही चव्हाण यांनी केला.मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरेल अशी आपणास भीती वाटते असा उपरोधीक टोलाही चव्हाण यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)