शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?

By admin | Updated: August 9, 2015 02:36 IST

तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी

मुंबई : तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या पाच वर्षात एकट्या महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, मानायचे असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडवणीस सरकार आल्यानंतर ‘मेक इन इंडिया’सारख्या घोषणा सतत ऐकावयास मिळत आहेत. राज्यामध्ये गुंतवणूक आणण्याकरिता अनेक देशांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब दौरे करत आहेत, प्रत्येक दौऱ्यानंतर राज्यावर हजारो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणांचा वर्षाव पहावयास मिळतो. पण प्रत्यक्षात वास्तव वेगळेच आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉन कंपनी आणि राज्य सरकार यांच्यात पाच अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा सामजस्य करार झाल्याचे जाहीर केले. त्या संदर्भात बोलताना चव्हाण असेही म्हणाले की, गुंतवणुकीचा हा आकडा जनतेची दिशाभूल करण्याकरिता वाढवून सांगितलेला नसावा आणि खरोखरच एवढ्या प्रमाणात गुंतवणूक यावी अशी कॉंग्रेस पक्षाची अपेक्षा आहे आपल्या या म्हणण्याचे अधिक स्पष्टिकरण देताना चव्हाण म्हणाले, दोन तीन दिवसांपूर्वी याच टेरी गाऊ यांनी एका मुलाखतीमध्ये संपूर्ण भारत देशात दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील १० वर्षात करण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच सदर गुंतवणूक ही एकाच प्रकल्पात नव्हे तर अनेक सामंजस्य करारान्वये केली जाईल. म्हणजे अनेक कंपन्यांबरोबर विविध प्रकल्पांद्वारे ही गुंतवणूक नरेंद्र मोदी यांचे सरकार जर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत असेल तर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दोन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या उद्योगसमूहाचा मानस बदलला असेल तर त्याचे आपण स्वागतच करतो असेही चव्हाण म्हणाले. परंतु नरेंद्र मोदी सरकारची आणि एकंदरच भाजप सरकारची मानिसकता ही अतिरंजीत आश्वासने व प्रत्येक विषयाचे मार्केटिंग करण्याची राहिलेली आहे. २००३ पासून २०११ पर्यंत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले होते. परंतु त्यापैकी फक्त आठ टक्केच गुंतवणूक वास्तवात झाली, असा दावाही चव्हाण यांनी केला.मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरेल अशी आपणास भीती वाटते असा उपरोधीक टोलाही चव्हाण यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)