शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?

By admin | Updated: August 9, 2015 02:36 IST

तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी

मुंबई : तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या पाच वर्षात एकट्या महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, मानायचे असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडवणीस सरकार आल्यानंतर ‘मेक इन इंडिया’सारख्या घोषणा सतत ऐकावयास मिळत आहेत. राज्यामध्ये गुंतवणूक आणण्याकरिता अनेक देशांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब दौरे करत आहेत, प्रत्येक दौऱ्यानंतर राज्यावर हजारो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणांचा वर्षाव पहावयास मिळतो. पण प्रत्यक्षात वास्तव वेगळेच आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉन कंपनी आणि राज्य सरकार यांच्यात पाच अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा सामजस्य करार झाल्याचे जाहीर केले. त्या संदर्भात बोलताना चव्हाण असेही म्हणाले की, गुंतवणुकीचा हा आकडा जनतेची दिशाभूल करण्याकरिता वाढवून सांगितलेला नसावा आणि खरोखरच एवढ्या प्रमाणात गुंतवणूक यावी अशी कॉंग्रेस पक्षाची अपेक्षा आहे आपल्या या म्हणण्याचे अधिक स्पष्टिकरण देताना चव्हाण म्हणाले, दोन तीन दिवसांपूर्वी याच टेरी गाऊ यांनी एका मुलाखतीमध्ये संपूर्ण भारत देशात दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील १० वर्षात करण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच सदर गुंतवणूक ही एकाच प्रकल्पात नव्हे तर अनेक सामंजस्य करारान्वये केली जाईल. म्हणजे अनेक कंपन्यांबरोबर विविध प्रकल्पांद्वारे ही गुंतवणूक नरेंद्र मोदी यांचे सरकार जर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत असेल तर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दोन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या उद्योगसमूहाचा मानस बदलला असेल तर त्याचे आपण स्वागतच करतो असेही चव्हाण म्हणाले. परंतु नरेंद्र मोदी सरकारची आणि एकंदरच भाजप सरकारची मानिसकता ही अतिरंजीत आश्वासने व प्रत्येक विषयाचे मार्केटिंग करण्याची राहिलेली आहे. २००३ पासून २०११ पर्यंत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले होते. परंतु त्यापैकी फक्त आठ टक्केच गुंतवणूक वास्तवात झाली, असा दावाही चव्हाण यांनी केला.मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरेल अशी आपणास भीती वाटते असा उपरोधीक टोलाही चव्हाण यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)