शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 08:03 IST

Rajesh Tope : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले की, रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील निर्बंध कठोर केले जाऊ शकतात.

मुंबई :  महाराष्ट्रातील कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या ही धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे, तर मुंबईतील संसर्गाचा दर चार टक्के इतका असून मुंबईच्या दृष्टीने ही बाब खूपच चिंतेची असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले की, रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईसह राज्यातील निर्बंध कठोर केले जाऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य खाते आणि टास्क फोर्स यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा टोपे यांनी दिला.

आठवड्याभरापूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबरला राज्यात कोरोनाचे ६ हजार सक्रिय रुग्ण होते. २८ तारखेला ही संख्या ११ हजार ४९२ वर पोहोचली. सायंकाळी ही संख्या २० हजारांपर्यंत जाऊ शकते, असा इशारा टोपे यांनी यावेळी दिला.  मुंबईत आठवडाभरापूर्वी ३०० रुग्ण आढळले होते. दोन दिवसांत संख्या दुप्पट झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४००-५०० वरून बुधवारी दोन हजारांच्या पुढे असू शकेल, अशी स्थिती आहे. ही नक्कीच चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले. 

ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही७०० मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनचा खप गेला की, लॉकडाऊन लावण्याचे निकष आपण आधीच नक्की केले आहे. सध्या ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे चित्र नाही. मात्र, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, ही चिंतेची बाब असल्याचे टोपे म्हणाले.लाट असली तरी राज्याचा आरोग्य विभाग आणि यंत्रणा तयारीत आहोत. घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घ्यावी लागेल. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या