शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

डासांच्या उत्पत्तीला डबके पोषक

By admin | Updated: November 17, 2014 01:03 IST

उपराजधानीत डासांचा कहर झाला आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी या डासांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एकीकडे डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या त्यात या वाढत्या डासांमुळे

महानगरपालिकेचे दुर्लक्ष : डेंग्यूवर नियंत्रण कसे मिळणार?नागपूर : उपराजधानीत डासांचा कहर झाला आहे. विशेषत: सायंकाळच्या वेळी या डासांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. एकीकडे डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या त्यात या वाढत्या डासांमुळे भीतीचे वातावरण आहे. डेंग्यूच्या नियंत्रणावर महानगरपालिका घराघरांची झाडाझडती घेत असलीतरी वस्त्या-वस्त्यांमधील पाण्याच्या डबक्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पॉश वसाहतींसोबतच झोपडपट्ट्यांमधील हे डबके डासांच्या उत्त्पत्तीचे केंद्र ठरत आहे. यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून कमी होणाऱ्या डेंग्यू रुग्णांची संख्या डिसेंबर महिना तोंडावर आला असतानाही कमी झालेली दिसून येत नाही. पावसाळयात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे असून याबाबत पूर्वकाळजी न घेतल्यामुळेच आज या रोगाने थैमान घातल्याचे दिसून येत आहे. आजार पसरू नयेत यासाठी जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार, निष्काळजीपणा या अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले गेले आहे. पालिकेने आता युद्धपातळीवर डेंग्यूचा सामना करण्यासाठी कंबर कसली असली तरी डेंग्यूने आधीच हातपाय पसरले आहेत. मागील वर्षी डेंग्यूचे ३५२ रुग्ण आढळून आले होते, या वर्षी रुग्णांची संख्या नोव्हेंबर महिन्यातच ३०० वर गेली आहे. साथींना अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. पण डास निर्मूलनावरील मोहीम अबेटसारख्या किटकनाशकाच्या फवारणीपर्यंतच मर्यादित आहे. यातच हे कीटकनाशक प्रभावहिन असल्याने त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. क्वचितच होत असलेली धूरफवारणीचाही प्रभाव डासांवर होत नाही. डेंग्यूचा प्रकोप असतानाही सार्वजनिक विहीर, नळ परिसरात पाण्याचे डबक्यांकडे संबंधित झोनचे लक्ष गेलेले नाही. डासांच्या उत्पत्तीला हे डबके पोषक ठरल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. विशेष म्हणजे, तक्रार करूनही एकमेकांकडे बोट दाखविण्यापलीकडे काहीच होत नाही. यामुळे मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडून ज्या घरांची तपासणी झाली त्याच घरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. (प्रतिनिधी) टीबी वॉर्डाचे मैदानराजाबाक्षालगत असलेल्या टीबी वॉर्डाच्या मैदानात सार्वजनिक विहीर आहे. ही विहीर धंतोली झोनच्या हद्दीत येते. परंतु विहिरीच्या पाण्याचा वापर मोटार बसवून हनुमाननगर झोन हद्दीतील राजाबाक्षावासी करतात. यासाठी विद्युत जोडणी धंतोली झोनने करून दिली आहे. विहिरीवरही नळ बसविण्यात आले आहेत. या पाण्याचा उपयोग धुणी-भांडी करण्यापासून ते वाहने धुण्यापर्यंत केला जातो. विशेष म्हणजे, विहीरवर मोटारपंप बसविण्यापूर्वी सांडपाणी वाहून जाण्याचे सौजन्य हनुमानगरझोनने दाखविले नाही. यामुळे परिसरातच नाही तर पाण्याचे डबके मेडिकल चौक रस्त्यापर्यंत साचलेले असते. या संदर्भाची माहिती दोन्ही झोनच्या झोनल अधिकाऱ्यांना आहे, परंतु अद्यापही उपाययोजना नाही. यशोधरानगरयशोधरानगर मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागून वर्ष झाले. परंतु संबंधित विभागाचे लक्ष नाही. रस्त्याच्या कडेला दोन ठिकाणी पाण्याचे मोठे डबके निर्माण झाले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरात डेंग्यूसोबत मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. या समस्येच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता विजय खवसे यांनी झोनमध्ये तक्रार केली. अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली, परंतु अद्यापही समस्यांचे निराकरण झालेले नाही.