शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पायाभूत सुविधा क्षेत्र वाढल्यास ‘एनपीए’ घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 03:52 IST

सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायला सुरुवात झाल्यास राष्ट्रीयीकृत बँकांचा वेगाने वाढत असलेला ‘एनपीए’ (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) कमी होईल

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायला सुरुवात झाल्यास राष्ट्रीयीकृत बँकांचा वेगाने वाढत असलेला ‘एनपीए’ (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) कमी होईल, असे मत युनियन बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण तिवारी यांनी व्यक्त केले.अरुण तिवारी आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी रविवारी बँक क्षेत्राशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली. विजय दर्डा यांचे निवासस्थान यवतमाळ हाऊस येथे ही चर्चा झाली. याप्रसंगी वरिष्ठ संपादकीय कर्मचारी उपस्थित होते. तिवारी यांनी ‘एनपीए’संदर्भात वरीलप्रमाणे भूमिका मांडली. देशातील सर्व २६ राष्ट्रीयीकृत बँकांचा ‘एनपीए’ सहा लाख कोटी रुपयांवर गेला आहे. युनियन बँकेचादेखील ‘एनपीए’ ७ टक्के असून, ही रक्कम सुमारे २१ हजार कोटी रुपये होते. राष्ट्रीयीकृत बँकांचा ७० टक्के ‘एनपीए’ सिमेंट, पोलाद, ऊर्जा, कोळसा यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योगांमुळे आहे. विद्यमान शासनाकडे राजकीय इच्छाशक्ती असून, या शासनाने सदर क्षेत्राला वर आणण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. सिमेंट उद्योगाने कात टाकायला सुरुवात केली असून, अन्य उद्योगही मंदीतून लवकरच बाहेर येतील. त्यामुळे ‘एनपीए’ घटायला लागेल, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.‘एनपीए’ वाढत असल्यामुळे युनियन बँक आॅफ इंडियाने गेल्या दोन वर्षांपासून कॉर्पोरेट कर्ज वितरण बंद केले आहे. त्याऐवजी किरकोळ व्यापार, कृषी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही योजना यशस्वी ठरली असून गेल्या दोन वर्षांमध्ये या क्षेत्रातील ‘लोन पोर्टफोलिओ’मध्ये २२ ते २६ टक्के वृद्धी झाली आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली. युनियन बँकेकडे सध्या ३ लाख ७८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यात सुमारे ३५ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार कोटी रुपयांच्या ठेवी चालू व बचत खात्यांतील आहेत. त्यामुळे बँकेचा कर्जावरील खर्च कमी करण्यास व कर्ज वितरणाचे नवीन धोरण पुढे लागू ठेवण्यास मदत होत आहे, असे तिवारी यांनी सांगितले.विदेशी गंगाजळीबाबत तिवारी यांनी म्हणाले, भारताकडे सध्या ३ कोटी ७५ हजार यूएस डॉलर्स विदेशी चलन असून, परिस्थिती समाधानकारक आहे. शेतकऱ्यांकडे मौल्यवान जमीन असूनही त्यांना कर्ज का मिळत नाही, याचे स्पष्टीकरण देताना तिवारी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. याप्रसंगी युनियन बँकेचे महाव्यवस्थापक एम. व्यंकटेश, नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक दास व लोकमत वृत्तपत्र समूहाचे वित्त नियंत्रक सीए मोहन जोशी उपस्थित होते.विजय दर्डा यांनी बँक-ग्राहक नात्याविषयी प्रश्न विचारला असता तिवारी यांनी गमतीदार उत्तर दिले. भारतामध्ये बँक-ग्राहक नाते हिंदू पती-पत्नीसारखे आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम असते व त्यांची भांडणेही होतात. असेच बँक व ग्राहकांचे आहे. त्यांचे नाते काळानुसार अधिक घट्ट होत जाते, असे तिवारी यांनी सांगितले.अरुण तिवारी यांनी यवतमाळ हाऊस येथे प्रवेश केला असता त्यांचे कपाळाला कुंकुवाचा टिळा लावून स्वागत करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना विजय दर्डा यांनी ही परंपरा त्यांच्या दिवंगत मातोश्री वीणादेवी दर्डा यांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुरू केली होती, असे सांगितले. मातोश्री वीणादेवी दर्डा यांचा २०१२ मध्ये स्वर्गवास झाला आहे. ही परंपरा आजही पाळली जात आहे, असे सांगताना विजय दर्डा भावूक झाले होते.