शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

विधिमंडळाचे कामकाज होणार आता आॅनलाइन!

By admin | Updated: October 7, 2015 05:38 IST

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजातील कागदी मेळ संपून ते आता आॅनलाइन झाले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील भाषणे प्रोसिडिंगच्या स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध

- अतुल कुलकर्णी,  मुंबईमहाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजातील कागदी मेळ संपून ते आता आॅनलाइन झाले आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील भाषणे प्रोसिडिंगच्या स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, यापुढे आमदारांना आपले प्रश्न, लक्षवेधी आदी विधिमंडळ सचिवालयाकडे देण्याची गरज भासणार नाही. कारण प्रश्न विचारण्याचीदेखील आॅनलाइन सोय झाली आहे. संपूर्ण कामकाज पेपरलेस करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.याबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सांगितले की, गेल्या ५ अधिवेशनांत विधिमंडळाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आॅनलाइन पद्धतीवर काम करून त्यातील दोष दूर केले. त्यानंतरच ही पद्धती आता आमदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. आमदारांना ही पद्धती कोठूनही व कधीही वापरता येईल. त्यांच्या स्वीय साहाय्यकांना अथवा त्यांना स्वत:ला त्यासाठी विधान भवनात येण्याची गरज उरणार नाही. कोणत्या आमदारांनी कोणते प्रश्न कधी विचारले, त्या प्रश्नांना संबंधित विभागाने कोणते उत्तर दिले हे त्यांना घरबसल्या पाहता येणार आहे. सदस्यांना त्यांचा स्वत:चे कामकाजसुध्दा आॅनलाईन पाहता येईल. त्यांनी केलेली भाषणे प्रोसेडिंगच्या स्वरुपात त्यांना उपलब्ध होतील. नागपूर अधिवेशनापासून ही कार्यपध्दती अंमलात येईल. त्यासाठी ३० दिवस आधी आमदार अथवा त्यांच्या पीएना आॅनलाईन प्रश्न टाकता येतील. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून संबंधित विभागाकडून येणारी उत्तरे आॅनलाईन मागवली जाणार असून, प्रश्नांचे बॅलेटींगही आॅनलाईन होणार आहे. ‘या कामासाठी तत्कालीन अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती व विद्यमान संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतल्याने यावर्षी आपण ही पद्धती आमदारांसाठी खुली करू शकलो,’ असे निंबाळकर म्हणाले.आॅनलाइन पद्धती1) आमदारांना लॉगिन नेम आणि पासवर्ड दिला जाईल.2) तारांकित, अतारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा, अल्प सूचना, अशासकीय ठराव, लक्षवेधी सूचना या गोष्टी आॅनलाइन देता येतील.3) एखाद्या सदस्याला एकापेक्षा जास्त प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी ‘बल्क पूटअप’चा पर्याय निवडता येईल. प्रश्नांचे क्रमही आमदारांना ठरवता येतील.न विचारता आमदाराचे नाव टाकणे बंद होणार!... आपल्या प्रश्नाला महत्त्व यावे म्हणून अन्य आमदारांची नावे टाकण्याची आजवरची प्रथा बंद होणार आहे. कारण एखाद्या आमदाराने आपल्या प्रश्नाच्या पाठिंब्यादाखल अन्य आमदारांची नावे दिली असतील तर तो प्रश्न त्या चार आमदारांच्या लॉगिनमध्ये जाईल. त्यानंतर त्या आमदारांना तो प्रश्न ‘अ‍ॅक्सेप्ट’ अथवा ‘रिजेक्ट’ अशा दोनपैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल. असे केल्याशिवाय तो प्रश्न पुढेच जाणार नाही.