शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

अब की बार विदर्भ की सरकार

By admin | Updated: June 30, 2014 00:50 IST

विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी

जनमंचचा पुढाकार : विदर्भवाद्यांनी घेतली शपथनागपूर : विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी संविधान चौकात स्वतंत्र विदर्भासाठी लढण्याची जाहीर शपथ घेतली. ‘जनमंच’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले. त्यानंतर जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. शरद पाटील यांनी शपथेचे जाहीर वाचन केले. त्यांच्यासह उपस्थित विदर्भवाद्यांनीही शपथ घेतली. ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी भूमिका विषद करताना सांगितले की, विदर्भाच्या विषयावर बोलून खूप झाले आहे. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. ते आज सत्तेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुका झाल्यावर काही खरे नाही. त्यामुळे जे करायचे आहे, ते निवडणुकांपूर्वीच करणे आवश्यक आहे. विदर्भाची मागणी केवळ पुढाऱ्यांची मागणी असल्याचे सांगून या आंदोलनाची हेटाळणी केली जात होती. परंतु आम्ही अमरावती आणि नागपुरात जनमत घेतले. त्यात ८८ टक्के अमरावतीकरांनी आणि ९६ टक्के नागपूरकरांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आता ही मागणी लोकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नेत्यांनीही घेतली शपथयावेळी विदर्भवाद्यांनी ‘हर-हर विदर्भ, घर-घर विदर्भ’ आणि ‘अब की बार विदर्भ की सरकार’ या घोषणांनी संविधान चौक दणाणून सोडला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही मार्गदर्शन करीत विदर्भासाठी लढण्याची शपथ घेतली. याप्रसंगी महापौर आ. प्रा. अनिल सोले, किशोर गजभिये, विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशनचे अध्यक्ष जे.पी. शर्मा, तेजिंदरसिंह रेणू, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, दिनेश नायडू, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दीपक निलावार, वेदचे देवेंद्र पारेख, शिवकुमार राव, राहुल उपगल्लावार, जनमंचचे प्रमोद पांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, राम आखरे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रकाश इटणकर, किशोर गुल्हाणे, नरेश क्षीरसागर, प्रवीण महाजन, सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके आदी उपस्थित होते. अशी घेतली शपथ‘ मी शपथ घेतो की, विदर्भातील जनतेचे लाचारीचे जिणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे, याकरिता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात पक्ष, धर्म, जात व इतर कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही’ अशी शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लावू पणाला प्राण... या गीताने विदर्भवाद्यांमध्ये उत्साह संचारला. (प्रतिनिधी)