शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

अब की बार विदर्भ की सरकार

By admin | Updated: June 30, 2014 00:50 IST

विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी

जनमंचचा पुढाकार : विदर्भवाद्यांनी घेतली शपथनागपूर : विदर्भावर चर्चा खूप झाली. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य झालेच पाहिजे. ‘अब की बार विदर्भ की सरकार’ असा नारा देत विदर्भवाद्यांनी रविवारी सायंकाळी संविधान चौकात स्वतंत्र विदर्भासाठी लढण्याची जाहीर शपथ घेतली. ‘जनमंच’ या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले. त्यानंतर जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. शरद पाटील यांनी शपथेचे जाहीर वाचन केले. त्यांच्यासह उपस्थित विदर्भवाद्यांनीही शपथ घेतली. ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे यांनी भूमिका विषद करताना सांगितले की, विदर्भाच्या विषयावर बोलून खूप झाले आहे. आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. भाजपाने निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. ते आज सत्तेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुका झाल्यावर काही खरे नाही. त्यामुळे जे करायचे आहे, ते निवडणुकांपूर्वीच करणे आवश्यक आहे. विदर्भाची मागणी केवळ पुढाऱ्यांची मागणी असल्याचे सांगून या आंदोलनाची हेटाळणी केली जात होती. परंतु आम्ही अमरावती आणि नागपुरात जनमत घेतले. त्यात ८८ टक्के अमरावतीकरांनी आणि ९६ टक्के नागपूरकरांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आता ही मागणी लोकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नेत्यांनीही घेतली शपथयावेळी विदर्भवाद्यांनी ‘हर-हर विदर्भ, घर-घर विदर्भ’ आणि ‘अब की बार विदर्भ की सरकार’ या घोषणांनी संविधान चौक दणाणून सोडला. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही मार्गदर्शन करीत विदर्भासाठी लढण्याची शपथ घेतली. याप्रसंगी महापौर आ. प्रा. अनिल सोले, किशोर गजभिये, विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशनचे अध्यक्ष जे.पी. शर्मा, तेजिंदरसिंह रेणू, विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, दिनेश नायडू, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दीपक निलावार, वेदचे देवेंद्र पारेख, शिवकुमार राव, राहुल उपगल्लावार, जनमंचचे प्रमोद पांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके, अ‍ॅड. फिरदौस मिर्झा, राम आखरे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रकाश इटणकर, किशोर गुल्हाणे, नरेश क्षीरसागर, प्रवीण महाजन, सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके आदी उपस्थित होते. अशी घेतली शपथ‘ मी शपथ घेतो की, विदर्भातील जनतेचे लाचारीचे जिणे संपवून त्यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने व सुखाने जगता यावे, याकरिता स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात पक्ष, धर्म, जात व इतर कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही’ अशी शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लावू पणाला प्राण... या गीताने विदर्भवाद्यांमध्ये उत्साह संचारला. (प्रतिनिधी)