शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

अबब! राज्यभरात ४४ हजार विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून मारली शाळेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:50 IST

विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

- अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पटसंख्येअभावी एकेक शाळा बंद पडत असताना शाळेतच न येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत शाळा गाफील आहेत. तब्बल ४४ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. तर दुसरीकडे शिक्षण विभागाच्याचसरल प्रणालीमध्ये चक्क २ लाख ७५ हजार २८ विद्यार्थ्यांची नावे कोणत्याही शाळेच्या पटावर नोंदविली गेली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. खुद्द विद्या प्राधिकरणानेच ही आकडेवारी जाहीर करत चिंता व्यक्त केली आहे.

ही आकडेवारी जाहीर करत विद्या प्राधिकरणाचे सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ केले आहे. गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रानुसार, पहिली ते बाराव्या वर्गात शिकणाºया २ लाख ७५ हजर २८ विद्यार्थ्यांची नावे सध्या कोणत्याही शाळेच्या पटावर अधिकृतरीत्या नोंदविलेली नाही. संबंधित शाळांनी हे पावणे तीन लाख विद्यार्थी सरल प्रणालीच्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकून ठेवले आहेत. तर दुसरीकडे ४४ हजार ६९८ विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून शाळेतच आलेले नाहीत. हेपाहता राज्यात अद्यापही शाळाबाह्य मुलांची संख्या लाखाच्या घरात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हानिहाय शाळाबाह्य विद्यार्थीअहमदनगर ५६५, अकोला ७२८, अमरावती ६१७, औरंगाबाद ६१०, बीड २५४७, भंडारा १२, बुलडाणा ४५१, चंद्रपूर १०७४, धुळे १८१७, गडचिरोली ९८, गोंदिया ११९, हिंगोली ७८४, जळगाव १८५६, जालना ९९२, कोल्हापूर २९६, लातूर ३२९, मुंबई ४६५५, नागपूर ३६, नांदेड १०५४, नंदूरबार २७५४, नाशिक ३४४९, उस्मानाबाद २२५, पालघर ४४१, परभणी २५००, पुणे ८९६८, रायगड ६४५, रत्नागिरी १०७, सांगली २००, सातारा ६६२, सिंधुदुर्ग २३७, सोलापूर ३१४, ठाणे ५०२८, वर्धा ४३, वाशिम ७५ तर यवतमाळ जिल्ह्यात ४१० असे राज्यात एकूण ४४,६९८ विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. यात २३ हजार ८७३ मुली तर २० हजार ८२५ मुलांचा समावेश आहे.२२७० बालरक्षकांचीफौज काय करतेय?शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या समता विभागाने राज्यात २२७० शिक्षकांना बालरक्षक म्हणून तयार केले आहे. त्यांना प्रशिक्षितही केले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शिक्षकांनी स्वत:हून ही जबाबदारी पत्करली आहे. आता याच बालरक्षकांचा सक्षमपणे वापर करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्याचे निर्देश सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.