शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अबब! राज्यभरात ४४ हजार विद्यार्थ्यांनी महिनाभरापासून मारली शाळेला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:50 IST

विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.

- अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पटसंख्येअभावी एकेक शाळा बंद पडत असताना शाळेतच न येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत शाळा गाफील आहेत. तब्बल ४४ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी गेल्या महिनाभरात शाळेकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. तर दुसरीकडे शिक्षण विभागाच्याचसरल प्रणालीमध्ये चक्क २ लाख ७५ हजार २८ विद्यार्थ्यांची नावे कोणत्याही शाळेच्या पटावर नोंदविली गेली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. खुद्द विद्या प्राधिकरणानेच ही आकडेवारी जाहीर करत चिंता व्यक्त केली आहे.

ही आकडेवारी जाहीर करत विद्या प्राधिकरणाचे सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना ‘अलर्ट’ केले आहे. गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रानुसार, पहिली ते बाराव्या वर्गात शिकणाºया २ लाख ७५ हजर २८ विद्यार्थ्यांची नावे सध्या कोणत्याही शाळेच्या पटावर अधिकृतरीत्या नोंदविलेली नाही. संबंधित शाळांनी हे पावणे तीन लाख विद्यार्थी सरल प्रणालीच्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकून ठेवले आहेत. तर दुसरीकडे ४४ हजार ६९८ विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून शाळेतच आलेले नाहीत. हेपाहता राज्यात अद्यापही शाळाबाह्य मुलांची संख्या लाखाच्या घरात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हानिहाय शाळाबाह्य विद्यार्थीअहमदनगर ५६५, अकोला ७२८, अमरावती ६१७, औरंगाबाद ६१०, बीड २५४७, भंडारा १२, बुलडाणा ४५१, चंद्रपूर १०७४, धुळे १८१७, गडचिरोली ९८, गोंदिया ११९, हिंगोली ७८४, जळगाव १८५६, जालना ९९२, कोल्हापूर २९६, लातूर ३२९, मुंबई ४६५५, नागपूर ३६, नांदेड १०५४, नंदूरबार २७५४, नाशिक ३४४९, उस्मानाबाद २२५, पालघर ४४१, परभणी २५००, पुणे ८९६८, रायगड ६४५, रत्नागिरी १०७, सांगली २००, सातारा ६६२, सिंधुदुर्ग २३७, सोलापूर ३१४, ठाणे ५०२८, वर्धा ४३, वाशिम ७५ तर यवतमाळ जिल्ह्यात ४१० असे राज्यात एकूण ४४,६९८ विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. यात २३ हजार ८७३ मुली तर २० हजार ८२५ मुलांचा समावेश आहे.२२७० बालरक्षकांचीफौज काय करतेय?शाळाबाह्य मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या समता विभागाने राज्यात २२७० शिक्षकांना बालरक्षक म्हणून तयार केले आहे. त्यांना प्रशिक्षितही केले आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शिक्षकांनी स्वत:हून ही जबाबदारी पत्करली आहे. आता याच बालरक्षकांचा सक्षमपणे वापर करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्याचे निर्देश सहसंचालक राजेंद्र गोधने यांनी शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.