शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

आता तरी ‘दादागिरी’ थांबवा

By admin | Updated: January 20, 2017 00:17 IST

शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले.

पिंपरी चिंचवड : शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले. स्थानिक पातळीवर सातत्याने गटबाजीला प्रोत्साहन दिले. महापालिकेत दलालांना बसवून निष्ठावान कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक दिग्गज मोहरे पक्षाबाहेर गेले. ज्यांनी सगळ्यांसाठी खड्डे खोदले, त्यांनी आज स्वत:साठी मोठा खड्डा तयार करून घेतला. दलालांमुळे पक्षाची वाताहत झाली आहे, आता तरी दादागिरी थांबवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता गुरूवारी केली. पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाल्या, ‘‘शरद पवार यांच्या कार्यपद्धतीच्या प्रभावामुळे पुलोद आघाडी, एस काँग्रेस पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम केले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना गेल्या काही वर्षांपासून बाजूला ठेवले जात आहे. शहरातील नेतृत्त्वाची दादागिरी, प्रत्येक शब्दातून होणारी अवहेलना आणि सत्तेच्या नशेतून आलेल्या मुजोरीमुळे निष्ठावान कार्यकर्ते खरे बोलण्यासाठी घाबरत आहेत. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांनी दलालांचे ऐकून माझ्यावर सातत्याने अन्याय केला. परंतु, तरीही मी पक्ष सोडला नाही. स्वत:च्या हातात कायम सत्ता राहावी यासाठी स्थानिक पातळीवर एकमेकांमध्ये भांडणे लावली. त्यांच्यात एकी होऊ दिली नाही. त्यामुळे एकनिष्ठ असलेले आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासारखे मोहरे पक्षातून गळून पडले. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याने स्थानिकांसाठी खड्डे खोदले आणि त्यातून स्वत:साठी मोठा खड्डा तयार केला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि या खड्ड्यातच मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न गाडले गेले, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>हुकूमशाहीमुळे पक्ष कमकुवतशरद पवार यांनी लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेला पक्ष स्वत:च्याच घरातल्या लोकांनी हुकूमशाहीने कमकुवत केला. पक्षप्रमुखांनी डोळ्यांना झापडे बांधली की काय? असे दिसून येत आहे. चारित्र्य फक्त महिलांना नसते, तर पुरूषांनाही असते, हे नेते विसरले आहेत. या नेत्याच्या चारित्र्यावर बोलायचे म्हणजे अनेक दिवस कमी पडतील. नेते आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी, पिलावळांनी आणि दलालांनी चारित्र्याची भाषा केल्यास त्यांच्या चारित्र्याचा आलेख जनतेपुढे मांडला जाईल, असे सांगून दादा, आतातरी तुमची दादागिरी थांबवा, अशी टीका चव्हाण यांनी केली.