शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी ‘दादागिरी’ थांबवा

By admin | Updated: January 20, 2017 00:17 IST

शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले.

पिंपरी चिंचवड : शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले. स्थानिक पातळीवर सातत्याने गटबाजीला प्रोत्साहन दिले. महापालिकेत दलालांना बसवून निष्ठावान कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक दिग्गज मोहरे पक्षाबाहेर गेले. ज्यांनी सगळ्यांसाठी खड्डे खोदले, त्यांनी आज स्वत:साठी मोठा खड्डा तयार करून घेतला. दलालांमुळे पक्षाची वाताहत झाली आहे, आता तरी दादागिरी थांबवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता गुरूवारी केली. पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाल्या, ‘‘शरद पवार यांच्या कार्यपद्धतीच्या प्रभावामुळे पुलोद आघाडी, एस काँग्रेस पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम केले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना गेल्या काही वर्षांपासून बाजूला ठेवले जात आहे. शहरातील नेतृत्त्वाची दादागिरी, प्रत्येक शब्दातून होणारी अवहेलना आणि सत्तेच्या नशेतून आलेल्या मुजोरीमुळे निष्ठावान कार्यकर्ते खरे बोलण्यासाठी घाबरत आहेत. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांनी दलालांचे ऐकून माझ्यावर सातत्याने अन्याय केला. परंतु, तरीही मी पक्ष सोडला नाही. स्वत:च्या हातात कायम सत्ता राहावी यासाठी स्थानिक पातळीवर एकमेकांमध्ये भांडणे लावली. त्यांच्यात एकी होऊ दिली नाही. त्यामुळे एकनिष्ठ असलेले आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासारखे मोहरे पक्षातून गळून पडले. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याने स्थानिकांसाठी खड्डे खोदले आणि त्यातून स्वत:साठी मोठा खड्डा तयार केला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि या खड्ड्यातच मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न गाडले गेले, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>हुकूमशाहीमुळे पक्ष कमकुवतशरद पवार यांनी लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेला पक्ष स्वत:च्याच घरातल्या लोकांनी हुकूमशाहीने कमकुवत केला. पक्षप्रमुखांनी डोळ्यांना झापडे बांधली की काय? असे दिसून येत आहे. चारित्र्य फक्त महिलांना नसते, तर पुरूषांनाही असते, हे नेते विसरले आहेत. या नेत्याच्या चारित्र्यावर बोलायचे म्हणजे अनेक दिवस कमी पडतील. नेते आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी, पिलावळांनी आणि दलालांनी चारित्र्याची भाषा केल्यास त्यांच्या चारित्र्याचा आलेख जनतेपुढे मांडला जाईल, असे सांगून दादा, आतातरी तुमची दादागिरी थांबवा, अशी टीका चव्हाण यांनी केली.