शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी ‘दादागिरी’ थांबवा

By admin | Updated: January 20, 2017 00:17 IST

शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले.

पिंपरी चिंचवड : शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कायम तोडा आणि फोडाचे राजकारण केले. स्थानिक पातळीवर सातत्याने गटबाजीला प्रोत्साहन दिले. महापालिकेत दलालांना बसवून निष्ठावान कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले अनेक दिग्गज मोहरे पक्षाबाहेर गेले. ज्यांनी सगळ्यांसाठी खड्डे खोदले, त्यांनी आज स्वत:साठी मोठा खड्डा तयार करून घेतला. दलालांमुळे पक्षाची वाताहत झाली आहे, आता तरी दादागिरी थांबवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता गुरूवारी केली. पिंपरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाल्या, ‘‘शरद पवार यांच्या कार्यपद्धतीच्या प्रभावामुळे पुलोद आघाडी, एस काँग्रेस पुन्हा काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काम केले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना गेल्या काही वर्षांपासून बाजूला ठेवले जात आहे. शहरातील नेतृत्त्वाची दादागिरी, प्रत्येक शब्दातून होणारी अवहेलना आणि सत्तेच्या नशेतून आलेल्या मुजोरीमुळे निष्ठावान कार्यकर्ते खरे बोलण्यासाठी घाबरत आहेत. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांनी दलालांचे ऐकून माझ्यावर सातत्याने अन्याय केला. परंतु, तरीही मी पक्ष सोडला नाही. स्वत:च्या हातात कायम सत्ता राहावी यासाठी स्थानिक पातळीवर एकमेकांमध्ये भांडणे लावली. त्यांच्यात एकी होऊ दिली नाही. त्यामुळे एकनिष्ठ असलेले आझम पानसरे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यासारखे मोहरे पक्षातून गळून पडले. शहराचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याने स्थानिकांसाठी खड्डे खोदले आणि त्यातून स्वत:साठी मोठा खड्डा तयार केला. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता गेली आणि या खड्ड्यातच मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न गाडले गेले, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>हुकूमशाहीमुळे पक्ष कमकुवतशरद पवार यांनी लोकशाहीच्या तत्त्वावर उभारलेला पक्ष स्वत:च्याच घरातल्या लोकांनी हुकूमशाहीने कमकुवत केला. पक्षप्रमुखांनी डोळ्यांना झापडे बांधली की काय? असे दिसून येत आहे. चारित्र्य फक्त महिलांना नसते, तर पुरूषांनाही असते, हे नेते विसरले आहेत. या नेत्याच्या चारित्र्यावर बोलायचे म्हणजे अनेक दिवस कमी पडतील. नेते आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी, पिलावळांनी आणि दलालांनी चारित्र्याची भाषा केल्यास त्यांच्या चारित्र्याचा आलेख जनतेपुढे मांडला जाईल, असे सांगून दादा, आतातरी तुमची दादागिरी थांबवा, अशी टीका चव्हाण यांनी केली.