शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्यात अब की बार महायुतीची सरकार

By admin | Updated: August 10, 2014 12:41 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा शिवसेना - भाजपा महायुतीचा विजय होईल असे भाकीत एबीपी न्यू आणि नेल्सनने वर्तवले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १० - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा  शिवसेना - भाजपा महायुतीचा विजय होईल असे भाकीत एबीपी न्यू आणि नेल्सनने वर्तवले आहे. विशेष म्हणजे  महायुती किंवा स्वबळावर लढल्यास राज्यात सर्वाधिक जागा भाजपलाच मिळतील असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
एबीपी न्यूज आणि नेल्सनने जुलै ते ऑगस्ट याकालावधीत सुमारे २२ हजार सॅम्पल गोळा करुन विधानसभेसाठी जनमत जाणून घेतले. यानुसार राज्यातील २८८ जागांपैकी महायुतीला २१० आणि आघाडीला फक्त ५५ जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. महायुतीतील २१० पैकी १२२ जागांवर भाजप, ८२ जागांवर शिवसेना, रिपाई आणि स्वाभिमानी प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर आघाडीत काँग्रेसला ३२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २३ जागांवर विजय मिळेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे. मनसेला यंदा ११ जागांवरच समाधान मानावे लागेल असे सांगितले जाते. 
----------
स्वबळावर लढल्यावरही भाजपचे पारडे जड
विधानसभेसाठी शिवसेना- भाजप-रिपाई- स्वाभिमानी यांची महायुती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती कायम असली तरी स्वबळावर लढल्यास भाजपचेच पारडे जड असल्याने सर्वेक्षणातून समोर येते. भाजपला ११२ जागा, शिवसेनेला ६२ जागा मिळतील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तर काँग्रेसला ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ जागांवर विजय मिळेल असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.  मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेले १४५ चे मॅजिक फिगर गाठण्यात सर्व पक्ष अपयशी ठरतील हे स्पष्ट होते. . 
----------
पृथ्वीराज चव्हाण अव्वल
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे अद्याप एकाही पक्षाने स्पष्ट केलेले नाही. मात्र एबीपी - नील्सनच्या सर्वेक्षणात मतदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. चव्हाण यांना २१ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला. तर त्याखालोखाल उद्धव ठाकरे १८ टक्के, देवेंद्र फडणवीस १६ टक्के यांचा क्रमांक लागला आहे. तर राज ठाकरेंना ८ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर आहेत.