शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

आता सेवानवृत्त शासकीय कर्मचार्‍यांनाही विमा छत्र!

By admin | Updated: August 10, 2014 20:56 IST

१ जुलै २0१४ नंतरच्या निंवृत्तीधारकांना मिळणार लाभ

वाशिम: शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवानवृत्तीनंतरही वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची सोय उपलब्ध करण्यासाठी, राज्य शासनाने वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजना आणली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही वैद्यकीय चाचणीविना अस्तित्वात असलेल्या आजारपणापासूनही संरक्षण अनुट्ठोय केले आहे.शासकीय कर्मचार्‍यांना वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे बहूतांश कर्मचारी वैद्यकीय विमा घेण्यासाठी इच्छूक नसतात. परिणामी सेवानवृत्तीनंतर नवृती वेतनाच्या र्मयादित स्त्रोतामधून आजारपणांवरील उपचाराचा वाढता खर्च भागविणे कर्मचार्‍यांना शक्य होत नाही. विमा कंपन्याही नव्याने वैद्यकीय विमा छत्र देत नाहीत. विमा छत्र दिले तरी त्यासाठी वैद्यकीय चाचणी आवश्यक असते आणि आधीपासून असलेल्या आजारांना विमा संरक्षणही मिळत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन, शासनाने अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संघटना आणि विमा कंपन्यांदरम्यान वाटाघाटी घडवून आणल्या. त्यामध्ये विमा कंपन्यांनी संयुक्तरित्या गट वैद्यकीय विम्याचा प्रस्ताव समोर ठेवला. या प्रस्तावानुसार सेवानवृत्त कर्मचार्‍यांना वैद्यकीय चाचणीची गरज राहणार नसून, कर्मचार्‍यांना विमा घेतेवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांसाठीही विमा छत्र मिळणार आहे. ही गटविमाछत्र योजना १ जूलै २0१४ ते ३0 जून २0१५ दरम्यान सेवानवृत्त होणार्‍या सर्व गट अ, ब, व क दर्जाच्या अधिकारी कर्मचार्‍यांसाठी सक्तीची राहणार आहे. ही गट विमा पॉलीसी एक वर्षासाठी म्हणजेच १ जूलै २0१४ ते ३0 जून २0१५ पर्यंत राहणार असून, तीन वर्षापर्यंत तिचे आपोआपच नुतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुढील प्रत्येक वर्षी १ जूलै ते ३0 जूनदरम्यान सेवानवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी आपोआपच या योजनेत सहभागी करुन घेतले जाणार आहेत. ३0 जून २0११ नंतर सेवानवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी या योजनेत आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन स्वेच्छेने सहभागी होऊ शकतील. ही योजना ह्यथर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटरह्ण (टीपीए)मार्फत राबविण्यात येणार असून, राज्यातील १,२00 हून अधिक टीपीए अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयात, कॅशलेस पध्दतीने उपचार घेण्याची सोय या योजनेत राहणार आहे. या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संबंधीत कर्मचार्‍याला आगाऊ रक्कम भरावी लागणार नसून, रुग्णालयातील उपचाराचा खर्च अनुज्ञयतेप्रमाणे कॅशलेस पध्दतीने विमा कंपनीकडून थेट रुग्णालयास प्रदान केला जाणार आहे. यासोबतच अत्यंत तातडीच्या वेळी कोणत्याही रुग्णालयात उपचार करुन घेण्यासह त्या खर्चाची प्रतीपूर्ती अटीनुसार विमा कंपन्यांकडून केली जाण्याची सोयही विमाछत्र योजनेतून शासनाने सेवानवृत्त कर्मचार्‍यांना उपलब्ध करुन दिली आहे.