शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

डाळिंब उत्पादक होणार निर्यातदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 11:38 IST

पुढचे पाऊल : शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे.

- नितीन काळेल (सातारा)

डाळिंबातून चांगले  पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा तयार करतात. मात्र शेतकऱ्यांना कमी, तर व्यापाऱ्यांनाच जास्त पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्यात येणार आहे. व्यापाऱ्याला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे शेतकऱ्यांच्या खिशात राहणार आहेत. 

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहेत. मात्र हे डाळिंब व्यापाऱ्याच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांची कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असतील तर त्याच्या अटी काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करावयाचे झाल्यास त्याचे वजन २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंशी असणेही गरजेचे आहे, असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब पाठविली जातात. त्याची वाहतूक पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हाच यामागील उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी