शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब उत्पादक होणार निर्यातदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 11:38 IST

पुढचे पाऊल : शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे.

- नितीन काळेल (सातारा)

डाळिंबातून चांगले  पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा तयार करतात. मात्र शेतकऱ्यांना कमी, तर व्यापाऱ्यांनाच जास्त पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्यात येणार आहे. व्यापाऱ्याला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे शेतकऱ्यांच्या खिशात राहणार आहेत. 

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहेत. मात्र हे डाळिंब व्यापाऱ्याच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांची कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असतील तर त्याच्या अटी काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करावयाचे झाल्यास त्याचे वजन २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंशी असणेही गरजेचे आहे, असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब पाठविली जातात. त्याची वाहतूक पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हाच यामागील उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी