शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

डाळिंब उत्पादक होणार निर्यातदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 11:38 IST

पुढचे पाऊल : शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे.

- नितीन काळेल (सातारा)

डाळिंबातून चांगले  पैसे मिळतात म्हणून शेतकरी बागा तयार करतात. मात्र शेतकऱ्यांना कमी, तर व्यापाऱ्यांनाच जास्त पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच निर्यातदार व्हावे म्हणून सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने पाऊल उचलले आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्यात येणार आहे. व्यापाऱ्याला फळे न देण्याने दुप्पट, तिप्पट पैसे शेतकऱ्यांच्या खिशात राहणार आहेत. 

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक शेतकरी पूर्णपणे डाळिंब पिकांवर अवलंबून आहेत. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब युरोप, आखाती देशात निर्यात होत आहेत. मात्र हे डाळिंब व्यापाऱ्याच्या माध्यमातून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दर लागत नाही. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे. या कार्यालयाने जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादनाविषयी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना डाळिंबाचे व्यवस्थापन, खते, औषधे यांची कागदपत्रे, पत्रव्यवहार, डाळिंब निर्यात करायचे असतील तर त्याच्या अटी काय आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

बाहेरील देशात डाळिंब निर्यात करावयाचे झाल्यास त्याचे वजन २५० ग्रॅमच्या पुढे असणे आवश्यक आहे. ते कीडरोग मुक्त व कीडनाशक उर्वरित अंशी असणेही गरजेचे आहे, असे डाळिंब कंटेनरमधून पाठविली जातात. कंटेनरमध्ये साधारणपणे १२ ते २० टन डाळिंब पाठविली जातात. त्याची वाहतूक पाच डिग्री सेल्सिअस अंशामध्ये केली जाते, अशी माहिती डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हाच यामागील उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी