शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भ्रष्टाचाराविरोधात आता लोकांनीच कर न भरून असहकार आंदोलन करावं - हायकोर्ट

By admin | Updated: February 3, 2016 13:06 IST

सरकार जर भ्रष्टाचार आटोक्यात आणू शकत नसेल तर करदात्यांनी करावं तरी काय असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - भ्रष्टाचाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंतातूर उच्च न्यायालयानेच नागरिकांनीच याविरोधात आवाज उठवावा आणि असहकार आंदोलन करत कर भरू नये असा सल्ला दिला आहे. सरकार जर भ्रष्टाचार आटोक्यात आणू शकत नसेल तर करदात्यांनी करावं तरी काय असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं उपस्थित केला आहे. 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयापुढे सुरू आहे. महाराष्ट्र सरकार व बँक ऑफ महाराष्ट्र अशा दोघांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. 
पोलीस महासंचालकांनीही वृत्तापत्रांतून येत असलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्यांमधील सत्यता तपासावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. भ्रष्टाचार हा दहा तोंडी राक्षस झाला असून आता नागरिकांनीच एकत्र यायला हवं आणि सरकारला सांगायला हवं आता बस्स!  असे उद्गार न्यायालयाने काढले आहेत.
भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर नागरिकांनी एकत्र यायला हवं आणि असहकार आंदोलन करून कर भरण्यास नकार द्यायला हवा असा क्रांतीकारी सल्ला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरूण चौधरी यांनी यानिमित्तानं दिला आहे. 
न्यायालयाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रल्हाद पवार यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दर्शवला आहे. मातंग समाजातील गरीबांना देण्यासाठी असलेल्या २४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा पवार यांच्यावर आरोप आहे. 
 
काय म्हणालं हायकोर्ट:
- केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामगार संघटना सातव्या वेतन आयोगासाठी निदर्शनं करतात, परंतु त्यांचेच सहकारी भ्रष्टाचार करत असताना त्यांचा निषेधही करत नाहीत, त्यांना बहिष्कृत करत नाहीत वा त्यांच्याविरोधात आंदोलनही करत नाहीत.
- ज्याप्रकारे करदात्यांचा पैसा हडप केला जातो ते धक्कादायक आहे. मोठ्या पदांवर असलेल्या व्यक्ती दरोडे घालत आहेत.
- आता खरी वेळ आलीय लोकांनी एकत्र येऊन सरकारला भ्रष्टाचारासंदर्भात जाब विचारण्याची.
- करदाते हे अत्यंत संतप्तावस्थेत आहेत आणि त्यांना दोन दशकांपासून हा भ्रष्टाचाराचा त्रास भोगावा लागत आहे.
- भ्रष्टाचार हा दहा तोंडी राक्षस झाला आहे.
- करदात्यांची वेदना सरकारनं समजून घ्यायला हवी.
- करदात्यांचा पैसा कसा हडप केला जातो हे बघणं धक्कादायक आहे.
- आधुनिक भारतात नीतिमत्ता आणि मूल्यं पिछाडीवर पडली आहेत.