शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आता अधिकाऱ्यांचे ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 20:53 IST

कोरोनोत्तर काळात कार्यसंस्कृती उन्नत करण्याचे आवाहन

मुंबई : कोरोनोत्तर काळात स्वत:ला सावरण्याबरोबरच राज्याचे प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि गतिमान होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय नोकरी ही वेतन घेऊन समाजाची सेवा करण्याची संधी आहे, असे मानून कार्यसंस्कृती उन्नत करावी आणि आपल्या राज्याची विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.

महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे यांनी पत्रकाद्वारे अधिकारी, कर्मचारी यांना आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी कोरोना रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. यासाठी राज्य शासनामार्फत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे आता प्रशासकीय कामकाजाला गती देताना राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात ‘माझे कार्यालय, माझी जबाबदारी’ अभियान राबवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याअंतर्गत कार्यालयीन कामकाजातील अनावश्यक बाबींना कात्री लावून तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या कार्यालयातील कार्यपद्धती अधिक सुलभ आणि पारदर्शक कराव्यात. नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा ते अशक्य असल्यास त्यांना कार्यालयात कमीतकमी वेळा यावे लागेल, अशी सुधारणा करावी. नागरिकांशी संबंध येणाऱ्या कामाची नेमकी कार्यपद्धती तसेच आवश्यक कागदपत्रे काय आहेत याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयात दर्शनी भागात सहज उपलब्ध असावी. उद्योग व व्यापार यांना पोषक वातावरण तयार करावे, लाल फितीला फाटा देऊन नाविन्यपूर्ण कल्पनांना उत्तेजन द्यावे. शेतकरी, मजूर, अन्य गोरगरीब बांधव यांच्यापर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवावी. योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, कुठल्याही कामाचे योग्य रितीने नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले काम करताना अनेकदा बाह्य दबावाचा सामना करावा लागतो. असा सामना निर्धाराने व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकीच्या बळावर करणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणे व नियमांच्या चौकटीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या मागे महासंघ सदैव उभा असेल. सहकारी तसेच कार्यालयात येणारे अभ्यागत या सर्वांशी सौजन्यपूर्ण वागणूक आवश्यक आहे. आपल्या संपूर्ण कार्यसंस्कृतीचा मुख्य आधार हा शंभर टक्के प्रामाणिकपणा असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या