शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
5
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
6
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
7
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
8
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
9
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
10
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
11
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
12
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
13
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
16
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
17
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
18
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
19
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
20
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

‘आप’चे आता मिशन मुंबई

By admin | Updated: February 11, 2015 06:18 IST

दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर

मुंबई : दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर आता आपच्या नजरा मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीकडे वळल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारीला सुरुवात केली असून, आजच्या निकालाने त्याला आणखी बळ मिळणार असल्याचे ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांनी सांगितले. दिल्लीतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक एक हजार स्वयंसेवकांचा जत्था मुंबई आणि महाराष्ट्रातील होता. शिवाय सर्वाधिक निधीही राज्यातूनच उभारण्यात आल्याची माहिती गांधी यांनी दिली. मुंबई महापालिका आणि निवडणुकांसाठी आपने यापूर्वीच ‘मिशन विस्तार’ हाती घेतले आहे. आता बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचा संच उभारण्यावर भर दिला जाईल. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले जाणार असल्याचे गांधी म्हणाले. आगामी दोन वर्षांत मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आपने विधानसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. केवळ एकापाठोपाठ निवडणूक लढविणे आमचा उद्देश नाही. या पराभवानंतर पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी आम्ही वेळ घेतला. ‘मिशन विस्तार’ त्याचाच भाग होता. ग्रामीण आणि शहरी भागासाठी पक्षाने स्वतंत्र कार्यक्रम हाती घेतले असून, मुंबई महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि २२७ वॉर्डांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन केल्याचे मयांक गांधी म्हणाले.शहरी भागात ‘स्वराज अभियान’ राबविण्यात येणार असून, ग्रामीण भागातील प्रश्नांवरही स्वतंत्र समिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतमजुरांच्या प्रश्नांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘आप’चा विस्तार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)