शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

‘आप’चे आता मिशन मुंबई

By admin | Updated: February 11, 2015 06:18 IST

दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर

मुंबई : दिल्लीतील ऐतिहासिक विजयामुळे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दिल्लीच्या विजयानंतर आता आपच्या नजरा मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीकडे वळल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयारीला सुरुवात केली असून, आजच्या निकालाने त्याला आणखी बळ मिळणार असल्याचे ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांनी सांगितले. दिल्लीतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक एक हजार स्वयंसेवकांचा जत्था मुंबई आणि महाराष्ट्रातील होता. शिवाय सर्वाधिक निधीही राज्यातूनच उभारण्यात आल्याची माहिती गांधी यांनी दिली. मुंबई महापालिका आणि निवडणुकांसाठी आपने यापूर्वीच ‘मिशन विस्तार’ हाती घेतले आहे. आता बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचा संच उभारण्यावर भर दिला जाईल. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले जाणार असल्याचे गांधी म्हणाले. आगामी दोन वर्षांत मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आपने विधानसभा निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. केवळ एकापाठोपाठ निवडणूक लढविणे आमचा उद्देश नाही. या पराभवानंतर पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी आम्ही वेळ घेतला. ‘मिशन विस्तार’ त्याचाच भाग होता. ग्रामीण आणि शहरी भागासाठी पक्षाने स्वतंत्र कार्यक्रम हाती घेतले असून, मुंबई महानगर क्षेत्रासाठी स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि २२७ वॉर्डांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन केल्याचे मयांक गांधी म्हणाले.शहरी भागात ‘स्वराज अभियान’ राबविण्यात येणार असून, ग्रामीण भागातील प्रश्नांवरही स्वतंत्र समिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतमजुरांच्या प्रश्नांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘आप’चा विस्तार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)