शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

आता ‘मिशन जेईई-अ‍ॅडव्हान्स’

By admin | Updated: May 24, 2014 01:03 IST

देशातील अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ नंतर विद्यार्थ्यांसमोर आव्हान आहे ते ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चे. येत्या २५ तारखेला ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’

२५ मे रोजी परीक्षा : उपराजधानीतून ४०० हून अधिक विद्यार्थी तयारीत

नागपूर : देशातील अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ नंतर विद्यार्थ्यांसमोर आव्हान आहे ते ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चे. येत्या २५ तारखेला ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा होणार असून यातील गुणांच्या आधारे ‘आयआयटी’ व ‘आयएसएम-धनबाद’ सारख्या संस्थेचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहेत. या महत्त्वाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी कसून तयारीला लागले आहेत. देशस्तरावर ‘जेईई-मेन्स’मधून पहिल्या दीड लाख विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. नागपुरातील महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी ‘जेईई’साठी अर्ज केला होता. त्यातील ४०० हून अधिक विद्यार्थी ‘आयआयटी-अ‍ॅडव्हान्स’या परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा २५ मे रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात यासाठी केवळ चारच शहरात केंद्र देण्यात आली आहेत. यात नागपूरचादेखील समावेश आहे. ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेत विद्यार्थ्यांना ३ तासांचे २ पेपर द्यावे लागणार आहेत. पहिला पेपर सकाळी ९ ते १२ या वेळेत असून दुसरा पेपर दुपारी २ ते ५ या वेळेत आहे. दोन्ही पेपरमध्ये गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे प्रश्न राहतील. इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत प्रश्न विचारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचा सरावावर भर ४दरम्यान, ‘जेईई-मेन्स’च्या निकालानंतर ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची तयारी जोरात सुरू आहे. बहुतांश शिकवणी वर्गात दिवसभरात निरनिराळ्या सत्रांत विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात येत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी ‘सेल्फ-स्डडी’ तसेच सरावावर भर दिला आहे. या परीक्षेत हुशारीसोबतच ‘टाइम मॅनेजमेन्ट’ व समयसूचकता हेदेखील आवश्यक मुद्दे ठरणार आहेत. मूळ प्रवेशपत्र केंद्रांवरच मिळणार ४‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर इंटरनेटवरुन ‘डाऊनलोड’ केलेले ओळखपत्र न्यायचे आहे. परीक्षा केंद्रांवरच ओळख पटविल्यानंतर विद्यार्थ्यांना मूळ प्रवेशपत्र दिले जाणार आहे. हे मूळ प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी सांभाळून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण प्रवेशादरम्यान हे ओळखपत्र विद्यार्थ्यांना सादर करावे लागणार आहे.