शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

आता ‘डाव’ खरे होणार नाहीत!

By admin | Updated: April 27, 2016 03:37 IST

ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले.

ठाणे : ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले. त्यामुळे डावखरेसाहेब तुम्ही कितीही डाव आखलेत, तरी तुमचे ‘डाव’ आता ‘खरे’ होणार नाहीत, असा थेट टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी ठाण्यात लगावला. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे पुन्हा रिंगणात आहेत आणि शिवसेनेच्या पाठबळासाठी प्रयत्नशील आहेत, त्या पार्श्वभूमीवर कदम यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी सोमवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगतदार सोहळा झाला. त्याला पर्यावरणमंत्री रामदारस कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन, मीरा-भाईंदरचे आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याद्वारे सरनाईक यांनी एकप्रकारे राजकीय शक्तीप्रदर्शन केल्याचे जाणवत होते. या सोहळ््यात कदम बोलत होते. ठाण्यातील शिवसेनेअंतर्गत सुप्त संघर्ष पुरेपूर ठावूक असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रात कोणी यशस्वीपणे पूर्ण केली असेल, तर ती एकनाथ शिंदे यांनी, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. हे काम ‘दाढीवाले’च करु शकतात, असे त्यांनी मिश्किलपणे म्हणताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला आणि व्यासपीठावरील मान्यवरांनाही हसू आवरले नाही. तत्पूर्वी शिंदे यांचा उल्लेख करत आम्ही दोघांनी एकमेकांच्या हातात घातलेला हात कधीही सुटणार नाही. कारण मैत्रीचा धागा हा अतूट असतो, अशा भावना विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी व्यक्त केल्या. आमदार सरनाईक हे आमच्याकडूनच राजकारणात आले आहेत. दिवाकर रावते असो, एकनाथ शिंदे असो हे सर्वच माझे मार्गदर्शक आहेत. सर्वांनीच मला प्रेम दिले आहे असे सांगत त्यांनी सरनाईक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतून ठाणे व मीरा-भाईंदरसाठी दिलेल्या दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा या वेळी पार पडला. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारीत ‘१८ एस कृष्णकुंज’चे प्रदर्शन झाले. या रुग्णवाहिकांचा फायदा दोन्ही शहरांना होईल, अशी भावना सरनाईक यांनी व्यक्त केली. ठाणे शहर जसे विकसित झाले, तसेच काम मीरा-भाईंदरमध्येही केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्याप्रमाणे मीरा-भाईंदरमध्येही रस्ता रुंदीकरण केले जाणार असून हे शहर अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे. तसेच तेथे चांगल्या सुविधा दिल्या जातील. वाढदिवसानिमित्त होर्डिगची व पुष्पगुच्छाची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कन्यादान योजनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच सुपूर्द केली जाणार असल्याचे त्यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)सरनाईक यांचे कौतुकआमदार सरनाईक यांचे कौतुक करत पालकमंत्री शिंदे यांनी, आमदार अनेक असतात परंतु आपल्या मतदारसंघात लोकांना काय हवे याचे अचूक ज्ञान-त्याची माहिती सरनाईक यांना नेहमीच असते, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. मेट्रो ठाण्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्रीही शिंदे यांनी सरनाईक यांना दिली. मैत्री राजकारणापलिकडचीशहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्यानुसार पाण्याची गरजही वाढत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण आवश्यक आहे. स्त्रोत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. वसंत डावखरे यांच्यासोबतची मैत्री राजकारणापलिकडील असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.