शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आता ‘डाव’ खरे होणार नाहीत!

By admin | Updated: April 27, 2016 03:37 IST

ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले.

ठाणे : ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले. त्यामुळे डावखरेसाहेब तुम्ही कितीही डाव आखलेत, तरी तुमचे ‘डाव’ आता ‘खरे’ होणार नाहीत, असा थेट टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी ठाण्यात लगावला. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे पुन्हा रिंगणात आहेत आणि शिवसेनेच्या पाठबळासाठी प्रयत्नशील आहेत, त्या पार्श्वभूमीवर कदम यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी सोमवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगतदार सोहळा झाला. त्याला पर्यावरणमंत्री रामदारस कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन, मीरा-भाईंदरचे आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याद्वारे सरनाईक यांनी एकप्रकारे राजकीय शक्तीप्रदर्शन केल्याचे जाणवत होते. या सोहळ््यात कदम बोलत होते. ठाण्यातील शिवसेनेअंतर्गत सुप्त संघर्ष पुरेपूर ठावूक असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रात कोणी यशस्वीपणे पूर्ण केली असेल, तर ती एकनाथ शिंदे यांनी, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. हे काम ‘दाढीवाले’च करु शकतात, असे त्यांनी मिश्किलपणे म्हणताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला आणि व्यासपीठावरील मान्यवरांनाही हसू आवरले नाही. तत्पूर्वी शिंदे यांचा उल्लेख करत आम्ही दोघांनी एकमेकांच्या हातात घातलेला हात कधीही सुटणार नाही. कारण मैत्रीचा धागा हा अतूट असतो, अशा भावना विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी व्यक्त केल्या. आमदार सरनाईक हे आमच्याकडूनच राजकारणात आले आहेत. दिवाकर रावते असो, एकनाथ शिंदे असो हे सर्वच माझे मार्गदर्शक आहेत. सर्वांनीच मला प्रेम दिले आहे असे सांगत त्यांनी सरनाईक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतून ठाणे व मीरा-भाईंदरसाठी दिलेल्या दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा या वेळी पार पडला. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारीत ‘१८ एस कृष्णकुंज’चे प्रदर्शन झाले. या रुग्णवाहिकांचा फायदा दोन्ही शहरांना होईल, अशी भावना सरनाईक यांनी व्यक्त केली. ठाणे शहर जसे विकसित झाले, तसेच काम मीरा-भाईंदरमध्येही केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्याप्रमाणे मीरा-भाईंदरमध्येही रस्ता रुंदीकरण केले जाणार असून हे शहर अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे. तसेच तेथे चांगल्या सुविधा दिल्या जातील. वाढदिवसानिमित्त होर्डिगची व पुष्पगुच्छाची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कन्यादान योजनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच सुपूर्द केली जाणार असल्याचे त्यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)सरनाईक यांचे कौतुकआमदार सरनाईक यांचे कौतुक करत पालकमंत्री शिंदे यांनी, आमदार अनेक असतात परंतु आपल्या मतदारसंघात लोकांना काय हवे याचे अचूक ज्ञान-त्याची माहिती सरनाईक यांना नेहमीच असते, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. मेट्रो ठाण्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्रीही शिंदे यांनी सरनाईक यांना दिली. मैत्री राजकारणापलिकडचीशहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्यानुसार पाण्याची गरजही वाढत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण आवश्यक आहे. स्त्रोत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. वसंत डावखरे यांच्यासोबतची मैत्री राजकारणापलिकडील असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.