शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘डाव’ खरे होणार नाहीत!

By admin | Updated: April 27, 2016 03:37 IST

ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले.

ठाणे : ज्यांचे ‘डाव’ आजवर ‘खरे’ ठरले ते मातोश्रींच्या आशीर्वादानेच ठरले. त्यामुळे डावखरेसाहेब तुम्ही कितीही डाव आखलेत, तरी तुमचे ‘डाव’ आता ‘खरे’ होणार नाहीत, असा थेट टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी ठाण्यात लगावला. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे पुन्हा रिंगणात आहेत आणि शिवसेनेच्या पाठबळासाठी प्रयत्नशील आहेत, त्या पार्श्वभूमीवर कदम यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी सोमवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगतदार सोहळा झाला. त्याला पर्यावरणमंत्री रामदारस कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन, मीरा-भाईंदरचे आयुक्त अच्युत हांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याद्वारे सरनाईक यांनी एकप्रकारे राजकीय शक्तीप्रदर्शन केल्याचे जाणवत होते. या सोहळ््यात कदम बोलत होते. ठाण्यातील शिवसेनेअंतर्गत सुप्त संघर्ष पुरेपूर ठावूक असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रात कोणी यशस्वीपणे पूर्ण केली असेल, तर ती एकनाथ शिंदे यांनी, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. हे काम ‘दाढीवाले’च करु शकतात, असे त्यांनी मिश्किलपणे म्हणताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला आणि व्यासपीठावरील मान्यवरांनाही हसू आवरले नाही. तत्पूर्वी शिंदे यांचा उल्लेख करत आम्ही दोघांनी एकमेकांच्या हातात घातलेला हात कधीही सुटणार नाही. कारण मैत्रीचा धागा हा अतूट असतो, अशा भावना विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी व्यक्त केल्या. आमदार सरनाईक हे आमच्याकडूनच राजकारणात आले आहेत. दिवाकर रावते असो, एकनाथ शिंदे असो हे सर्वच माझे मार्गदर्शक आहेत. सर्वांनीच मला प्रेम दिले आहे असे सांगत त्यांनी सरनाईक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतून ठाणे व मीरा-भाईंदरसाठी दिलेल्या दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा या वेळी पार पडला. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारीत ‘१८ एस कृष्णकुंज’चे प्रदर्शन झाले. या रुग्णवाहिकांचा फायदा दोन्ही शहरांना होईल, अशी भावना सरनाईक यांनी व्यक्त केली. ठाणे शहर जसे विकसित झाले, तसेच काम मीरा-भाईंदरमध्येही केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्याप्रमाणे मीरा-भाईंदरमध्येही रस्ता रुंदीकरण केले जाणार असून हे शहर अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे. तसेच तेथे चांगल्या सुविधा दिल्या जातील. वाढदिवसानिमित्त होर्डिगची व पुष्पगुच्छाची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कन्यादान योजनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच सुपूर्द केली जाणार असल्याचे त्यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)सरनाईक यांचे कौतुकआमदार सरनाईक यांचे कौतुक करत पालकमंत्री शिंदे यांनी, आमदार अनेक असतात परंतु आपल्या मतदारसंघात लोकांना काय हवे याचे अचूक ज्ञान-त्याची माहिती सरनाईक यांना नेहमीच असते, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. मेट्रो ठाण्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्रीही शिंदे यांनी सरनाईक यांना दिली. मैत्री राजकारणापलिकडचीशहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्यानुसार पाण्याची गरजही वाढत आहे. ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण आवश्यक आहे. स्त्रोत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. वसंत डावखरे यांच्यासोबतची मैत्री राजकारणापलिकडील असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.