शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

आता सरकारला ‘ताई’च उत्तर देणार!, ५० हजार कर्मचारी एकवटणार, आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:30 IST

राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनीती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनीती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. कृती समितीला बाजूला ठेवत समितीबाहेरील संघटनेला हाताशी घेऊन संप मागे घेण्याचा डाव सरकारने खेळला आहे. मात्र सरकारच्या या गनिमीकाव्याला ५० हजार अंगणवाडी ‘ताई’ आझाद मैदानात उतरून उत्तर देतील, असा इशाराच कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.कृती समितीचे निमंत्रक एम.ए. पाटील म्हणाले की, गेल्या ११ दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली संप सुरू ठेवला आहे. सरकारने अचानक ‘यू टर्न’ घेत संप मागे घेतल्याशिवाय चर्चा न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र कृती समिती संपावर ठाम राहिल्याने त्यात फूट पाडण्यासाठी सरकारने नोकरीवरून काढण्याची नोटीस अंगणवाडी कर्मचाºयांना पाठवली. त्यालाही कर्मचाºयांनी भीक घातली नाही, तर आशा वर्करला पोषण आहार वाटपाचे आदेश सरकारने दिले. मात्र आशा वर्करने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अंगणवाडी तार्इंच्या पाठीशी उभ्या राहण्याची घोषणा केली. त्यामुळे आता कृती समितीबाहेरील एका छोट्याशा संघटनेला चर्चेला बोलावून तुटपुंजी वाढ सरकारने घोषित केली आहे. २७ सप्टेंबरला ५० हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धडक देऊन सरकारला उत्तर देतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.सरकारला चर्चाच करायची होती, तर कृती समितीसोबत चर्चेची दारे का बंद केली, असा सवाल कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी उपस्थित केला. शमीम म्हणाल्या की, किमान साडेदहा हजार रुपये मानधनवाढ मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.>अंगणवाड्या उघडून दाखवाच!फुटकळ संघटनेला हाताशी घेऊन महिला व बाल विकासमंत्री आता अंगणवाडी कर्मचाºयांची दिशाभूल करत आहे. संप मागे घेतल्याची घोषणाही सरकारच करत असून एक तरी अंगणवाडी उघडून दाखवाच, असा इशारा कृती समितीने दिला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.