शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आता सरकारला ‘ताई’च उत्तर देणार!, ५० हजार कर्मचारी एकवटणार, आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:30 IST

राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनीती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनीती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. कृती समितीला बाजूला ठेवत समितीबाहेरील संघटनेला हाताशी घेऊन संप मागे घेण्याचा डाव सरकारने खेळला आहे. मात्र सरकारच्या या गनिमीकाव्याला ५० हजार अंगणवाडी ‘ताई’ आझाद मैदानात उतरून उत्तर देतील, असा इशाराच कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.कृती समितीचे निमंत्रक एम.ए. पाटील म्हणाले की, गेल्या ११ दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली संप सुरू ठेवला आहे. सरकारने अचानक ‘यू टर्न’ घेत संप मागे घेतल्याशिवाय चर्चा न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र कृती समिती संपावर ठाम राहिल्याने त्यात फूट पाडण्यासाठी सरकारने नोकरीवरून काढण्याची नोटीस अंगणवाडी कर्मचाºयांना पाठवली. त्यालाही कर्मचाºयांनी भीक घातली नाही, तर आशा वर्करला पोषण आहार वाटपाचे आदेश सरकारने दिले. मात्र आशा वर्करने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अंगणवाडी तार्इंच्या पाठीशी उभ्या राहण्याची घोषणा केली. त्यामुळे आता कृती समितीबाहेरील एका छोट्याशा संघटनेला चर्चेला बोलावून तुटपुंजी वाढ सरकारने घोषित केली आहे. २७ सप्टेंबरला ५० हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धडक देऊन सरकारला उत्तर देतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.सरकारला चर्चाच करायची होती, तर कृती समितीसोबत चर्चेची दारे का बंद केली, असा सवाल कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी उपस्थित केला. शमीम म्हणाल्या की, किमान साडेदहा हजार रुपये मानधनवाढ मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.>अंगणवाड्या उघडून दाखवाच!फुटकळ संघटनेला हाताशी घेऊन महिला व बाल विकासमंत्री आता अंगणवाडी कर्मचाºयांची दिशाभूल करत आहे. संप मागे घेतल्याची घोषणाही सरकारच करत असून एक तरी अंगणवाडी उघडून दाखवाच, असा इशारा कृती समितीने दिला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.