शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आता सरकारला ‘ताई’च उत्तर देणार!, ५० हजार कर्मचारी एकवटणार, आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:30 IST

राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनीती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.

मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनीती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. कृती समितीला बाजूला ठेवत समितीबाहेरील संघटनेला हाताशी घेऊन संप मागे घेण्याचा डाव सरकारने खेळला आहे. मात्र सरकारच्या या गनिमीकाव्याला ५० हजार अंगणवाडी ‘ताई’ आझाद मैदानात उतरून उत्तर देतील, असा इशाराच कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.कृती समितीचे निमंत्रक एम.ए. पाटील म्हणाले की, गेल्या ११ दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाºयांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली संप सुरू ठेवला आहे. सरकारने अचानक ‘यू टर्न’ घेत संप मागे घेतल्याशिवाय चर्चा न करण्याचा पवित्रा घेतला. मात्र कृती समिती संपावर ठाम राहिल्याने त्यात फूट पाडण्यासाठी सरकारने नोकरीवरून काढण्याची नोटीस अंगणवाडी कर्मचाºयांना पाठवली. त्यालाही कर्मचाºयांनी भीक घातली नाही, तर आशा वर्करला पोषण आहार वाटपाचे आदेश सरकारने दिले. मात्र आशा वर्करने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अंगणवाडी तार्इंच्या पाठीशी उभ्या राहण्याची घोषणा केली. त्यामुळे आता कृती समितीबाहेरील एका छोट्याशा संघटनेला चर्चेला बोलावून तुटपुंजी वाढ सरकारने घोषित केली आहे. २७ सप्टेंबरला ५० हजार अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर धडक देऊन सरकारला उत्तर देतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.सरकारला चर्चाच करायची होती, तर कृती समितीसोबत चर्चेची दारे का बंद केली, असा सवाल कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी उपस्थित केला. शमीम म्हणाल्या की, किमान साडेदहा हजार रुपये मानधनवाढ मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही.>अंगणवाड्या उघडून दाखवाच!फुटकळ संघटनेला हाताशी घेऊन महिला व बाल विकासमंत्री आता अंगणवाडी कर्मचाºयांची दिशाभूल करत आहे. संप मागे घेतल्याची घोषणाही सरकारच करत असून एक तरी अंगणवाडी उघडून दाखवाच, असा इशारा कृती समितीने दिला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष देऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.