शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

आता वेटिंग लिस्टचा आकडा वाढण्याची भीती!

By admin | Updated: April 2, 2015 04:58 IST

रेल्वेची मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे मिळवताना प्रवाशांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. दलालांकडूनच तिकीट आरक्षणात काळाबाजार केला जात असल्यानेच

मुंबई : दलालांना रोखण्याचे उद्दिष्ट ठेवत रेल्वे मंत्रालयाकडून तिकीट आरक्षण सेवा ६0 दिवसांवरून १२0 दिवस करण्यात आली. एप्रिलच्या पहिल्याच दिवशी आरक्षणाचा नवा नियम लागू होताच देशभरातील तिकीट आरक्षण दुपटीने वाढले आणि १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटे आरक्षित झाली. मात्र या नियमामुळे वेटिंग लिस्टचा आकडा वाढण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात असून, त्यामुळे कन्फर्म तिकिटे मिळविताना मारामार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वेची मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे मिळवताना प्रवाशांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. दलालांकडूनच तिकीट आरक्षणात काळाबाजार केला जात असल्यानेच वेटिंग लिस्टचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दलाली रोखण्यासाठी रेल्वेकडून ६0 दिवस अगोदर होणारे तिकीट आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आली. मात्र १ एप्रिलपासून नवा नियम लागू होताच तिकिटांचे आरक्षण दुपटीने वाढले. ६0 दिवस अगोदर तिकीट आरक्षणाच्या नियमामुळे देशभरात जवळपास ५ लाख तिकिटांचे आरक्षण होत असे. परंतु नव्या नियमामुळे हेच आरक्षण १० लाखांपेक्षा अधिक झाले. यापूर्वी ६0 दिवस अगोदर आरक्षण सेवा सुरू होत होती आणि आता त्या नंतरच्याही ६0 दिवस अगोदरच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्याने तिकीट आरक्षणात वाढ झाल्याचे दिल्लीतील आयआरसीटीसीतील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.वाढलेल्या या आरक्षणामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे आणि दलालीही रोखली जाईल, अशी आशा रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याच नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वेटिंग लिस्ट कमी करणार कशी, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना दलालांकडेच हात पसरवावे लागणार असल्याची चर्चाही होत आहे. (प्रतिनिधी)