शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

आता वेटिंग लिस्टचा आकडा वाढण्याची भीती!

By admin | Updated: April 2, 2015 04:58 IST

रेल्वेची मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे मिळवताना प्रवाशांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. दलालांकडूनच तिकीट आरक्षणात काळाबाजार केला जात असल्यानेच

मुंबई : दलालांना रोखण्याचे उद्दिष्ट ठेवत रेल्वे मंत्रालयाकडून तिकीट आरक्षण सेवा ६0 दिवसांवरून १२0 दिवस करण्यात आली. एप्रिलच्या पहिल्याच दिवशी आरक्षणाचा नवा नियम लागू होताच देशभरातील तिकीट आरक्षण दुपटीने वाढले आणि १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटे आरक्षित झाली. मात्र या नियमामुळे वेटिंग लिस्टचा आकडा वाढण्याची भीती रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात असून, त्यामुळे कन्फर्म तिकिटे मिळविताना मारामार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वेची मेल-एक्स्प्रेस गाड्यांची तिकिटे मिळवताना प्रवाशांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. दलालांकडूनच तिकीट आरक्षणात काळाबाजार केला जात असल्यानेच वेटिंग लिस्टचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दलाली रोखण्यासाठी रेल्वेकडून ६0 दिवस अगोदर होणारे तिकीट आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आली. मात्र १ एप्रिलपासून नवा नियम लागू होताच तिकिटांचे आरक्षण दुपटीने वाढले. ६0 दिवस अगोदर तिकीट आरक्षणाच्या नियमामुळे देशभरात जवळपास ५ लाख तिकिटांचे आरक्षण होत असे. परंतु नव्या नियमामुळे हेच आरक्षण १० लाखांपेक्षा अधिक झाले. यापूर्वी ६0 दिवस अगोदर आरक्षण सेवा सुरू होत होती आणि आता त्या नंतरच्याही ६0 दिवस अगोदरच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्याने तिकीट आरक्षणात वाढ झाल्याचे दिल्लीतील आयआरसीटीसीतील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.वाढलेल्या या आरक्षणामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे आणि दलालीही रोखली जाईल, अशी आशा रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र याच नव्या नियमामुळे वेटिंग लिस्टही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वेटिंग लिस्ट कमी करणार कशी, असा प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना दलालांकडेच हात पसरवावे लागणार असल्याची चर्चाही होत आहे. (प्रतिनिधी)