शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार

By admin | Updated: May 3, 2017 17:37 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आता थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे राज्य शासनाने प्रस्तावित केले आहे़ यासंदर्भात पणन विभागाने मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव मांडला आहे़ दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची गठीत करण्यात आली आहे़ या समितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली़बाजार समित्याच्या कार्यक्षेत्रातील सातबारा धारक शेतकरी व साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात अशा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़ महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या शेतमालास स्पर्धात्मक दर मिळावा, एकत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली़ राज्यात ३०६ बाजार समित्या आहेत़ या बाजार समित्यांमध्ये धान्य, फळे, भाजीपाला याची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री होत असते़ सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जवळपास ६५ हजार कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे़ या बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाचा खरेदीविक्रीचा व्यवहार होतो़ परंतू बाजार समिती संचालक मंडळात शेतकरी कुठेच नाही़ या समित्या त्यांच्या उद्दिष्टांपासून दूर जाताना अनेकवेळा पहावयास मिळते़ ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर समित्या चालतात त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा प्रतिनिधी असावा या उद्देशाने आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़