शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार

By admin | Updated: May 3, 2017 17:37 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आता थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे राज्य शासनाने प्रस्तावित केले आहे़ यासंदर्भात पणन विभागाने मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव मांडला आहे़ दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची गठीत करण्यात आली आहे़ या समितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली़बाजार समित्याच्या कार्यक्षेत्रातील सातबारा धारक शेतकरी व साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात अशा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़ महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या शेतमालास स्पर्धात्मक दर मिळावा, एकत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली़ राज्यात ३०६ बाजार समित्या आहेत़ या बाजार समित्यांमध्ये धान्य, फळे, भाजीपाला याची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री होत असते़ सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जवळपास ६५ हजार कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे़ या बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाचा खरेदीविक्रीचा व्यवहार होतो़ परंतू बाजार समिती संचालक मंडळात शेतकरी कुठेच नाही़ या समित्या त्यांच्या उद्दिष्टांपासून दूर जाताना अनेकवेळा पहावयास मिळते़ ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर समित्या चालतात त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा प्रतिनिधी असावा या उद्देशाने आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़