शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार

By admin | Updated: May 3, 2017 17:37 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आता थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे राज्य शासनाने प्रस्तावित केले आहे़ यासंदर्भात पणन विभागाने मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव मांडला आहे़ दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची गठीत करण्यात आली आहे़ या समितीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली़बाजार समित्याच्या कार्यक्षेत्रातील सातबारा धारक शेतकरी व साखर कारखान्यांच्या धर्तीवर जे शेतकरी बाजार समित्यांना शेतमाल पुरवठा करतात अशा शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले़ महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या शेतमालास स्पर्धात्मक दर मिळावा, एकत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यातून शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली़ राज्यात ३०६ बाजार समित्या आहेत़ या बाजार समित्यांमध्ये धान्य, फळे, भाजीपाला याची मोठया प्रमाणात खरेदी-विक्री होत असते़ सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात जवळपास ६५ हजार कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे़ या बाजार समित्यांमध्ये मोठया प्रमाणात शेतमालाचा खरेदीविक्रीचा व्यवहार होतो़ परंतू बाजार समिती संचालक मंडळात शेतकरी कुठेच नाही़ या समित्या त्यांच्या उद्दिष्टांपासून दूर जाताना अनेकवेळा पहावयास मिळते़ ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर समित्या चालतात त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा प्रतिनिधी असावा या उद्देशाने आता शेतकऱ्यांना बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असल्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले़