शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

आता बंगले, दालनांसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 05:28 IST

फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता मनाजोगती दालने आणि बंगले मिळविण्यासाठी नव्या मंत्र्यांची लगबग सुरू झाली आहे.

मुंबई : फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता मनाजोगती दालने आणि बंगले मिळविण्यासाठी नव्या मंत्र्यांची लगबग सुरू झाली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या दहा नव्या मंत्र्यांपैकी बहुतांश मंत्र्यांना मंत्रालयाच्या नवीन इमारतीतच दालन हवे आहे. त्यासाठी शपथविधी उरकताच आपल्या विश्वासू सहकारी, कार्यकर्त्यांकडे नव्या इमारतीतील संभाव्य दालनांचा अंदाज घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. नवीन इमारतीत कोणत्या मजल्यावरील कोणते दालन रिकामे आहे, आजूबाजूला कोणते मंत्री आहेत याचा धांडोळा घेतला जात आहे. काही उत्साही स्वीय सहायकांनी तर शपथविधीच्या दिवशी पाहणीचे काम उरकले. कोणते दालन घ्यावे, कधी पदभार स्वीकारावे याबाबत सल्लेही दिले जात आहेत. कोणता मजला अपशकुनी नाही अथवा अमुक ठिकाणच कसे चांगले, याची साद्यंत वर्णने केली जात आहेत. काही मंत्र्यांच्या सहायकांनी सामान्य प्रशासन विभागात त्यादृष्टीने विचारणाही केली. एका नव्या मंत्र्यांच्या सहायकाने तर मलबार हिल परिसरातच बंगला घेण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मंत्रालयाशेजारी बंगला घेतल्यास साहेबांचे कार्यकर्ते बंगल्यातच मुक्काम ठोकतील. या कार्यकर्त्यांमुळे काहीतरी गडबड होणार त्यापेक्षा मलबार हिलवरील बंगला घेतल्यास कार्यकर्त्यांचा ओघ कमी असेल, असा युक्तिवाद या सहायकाने केला. (प्रतिनिधी)मंत्री आस्थापनेसाठी अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणीनव्या मंत्र्यांकडे स्वीय सहायक, खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी आदी पदांवर वर्णी लागावी यासाठी शासकीय अधिकाऱ्यांंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जातीपासून आपल्याच गावचे, जिल्ह्यातले, भागातले अशी ओळख दिली जात आहे. मंत्र्याचे विश्वासू सहकारी, कार्यकर्त्यांकडे आमच्यासाठी थोडं शब्द टाका, अशी गळ घातली जात आहे.एका वजनदार माजी मंत्र्याच्या पीएसने नवीन मंत्र्यांच्या निकटवर्तीयांना फोनवर अनाहूत सल्ले देण्याचा कार्यक्रम चालविला आहे. मंत्री आस्थापनेवर चांगले अधिकारी घेतले पाहिजेत. हवे तर मला सांगा. मी प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्यांची नावे सुचवतो, अशी बतावणी सुरू केली आहे.या पीएने एका मंत्र्यांला शुभेच्छा देण्यासाठी फोन करून अनाहुत सल्ले देण्यास सुरुवात केली. त्यावर तुम्ही काही सांगायची गरज नाही. कोणाला घ्यायचे अथवा नाही, हे मला चांगले कळते, अशा शब्दांत या पीएसला फटकारल्याची खमंग चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.