शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आता बंगले, दालनांसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 05:28 IST

फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता मनाजोगती दालने आणि बंगले मिळविण्यासाठी नव्या मंत्र्यांची लगबग सुरू झाली आहे.

मुंबई : फडणवीस सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता मनाजोगती दालने आणि बंगले मिळविण्यासाठी नव्या मंत्र्यांची लगबग सुरू झाली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या दहा नव्या मंत्र्यांपैकी बहुतांश मंत्र्यांना मंत्रालयाच्या नवीन इमारतीतच दालन हवे आहे. त्यासाठी शपथविधी उरकताच आपल्या विश्वासू सहकारी, कार्यकर्त्यांकडे नव्या इमारतीतील संभाव्य दालनांचा अंदाज घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. नवीन इमारतीत कोणत्या मजल्यावरील कोणते दालन रिकामे आहे, आजूबाजूला कोणते मंत्री आहेत याचा धांडोळा घेतला जात आहे. काही उत्साही स्वीय सहायकांनी तर शपथविधीच्या दिवशी पाहणीचे काम उरकले. कोणते दालन घ्यावे, कधी पदभार स्वीकारावे याबाबत सल्लेही दिले जात आहेत. कोणता मजला अपशकुनी नाही अथवा अमुक ठिकाणच कसे चांगले, याची साद्यंत वर्णने केली जात आहेत. काही मंत्र्यांच्या सहायकांनी सामान्य प्रशासन विभागात त्यादृष्टीने विचारणाही केली. एका नव्या मंत्र्यांच्या सहायकाने तर मलबार हिल परिसरातच बंगला घेण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मंत्रालयाशेजारी बंगला घेतल्यास साहेबांचे कार्यकर्ते बंगल्यातच मुक्काम ठोकतील. या कार्यकर्त्यांमुळे काहीतरी गडबड होणार त्यापेक्षा मलबार हिलवरील बंगला घेतल्यास कार्यकर्त्यांचा ओघ कमी असेल, असा युक्तिवाद या सहायकाने केला. (प्रतिनिधी)मंत्री आस्थापनेसाठी अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणीनव्या मंत्र्यांकडे स्वीय सहायक, खासगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी आदी पदांवर वर्णी लागावी यासाठी शासकीय अधिकाऱ्यांंनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जातीपासून आपल्याच गावचे, जिल्ह्यातले, भागातले अशी ओळख दिली जात आहे. मंत्र्याचे विश्वासू सहकारी, कार्यकर्त्यांकडे आमच्यासाठी थोडं शब्द टाका, अशी गळ घातली जात आहे.एका वजनदार माजी मंत्र्याच्या पीएसने नवीन मंत्र्यांच्या निकटवर्तीयांना फोनवर अनाहूत सल्ले देण्याचा कार्यक्रम चालविला आहे. मंत्री आस्थापनेवर चांगले अधिकारी घेतले पाहिजेत. हवे तर मला सांगा. मी प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्यांची नावे सुचवतो, अशी बतावणी सुरू केली आहे.या पीएने एका मंत्र्यांला शुभेच्छा देण्यासाठी फोन करून अनाहुत सल्ले देण्यास सुरुवात केली. त्यावर तुम्ही काही सांगायची गरज नाही. कोणाला घ्यायचे अथवा नाही, हे मला चांगले कळते, अशा शब्दांत या पीएसला फटकारल्याची खमंग चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती.