शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कुपोषण रोखण्यासाठी आता कीर्तनकारांचा आधार

By admin | Updated: January 13, 2017 17:41 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 20 कीर्तनकार प्रबोधनाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती करणार आहेत. आरोग्य विभागाकडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत/ रमाकांत पाटील

नंदुरबार, दि. 13 - समाज मनावर घट्ट चिकटून बसलेल्या अंधश्रद्धा आणि वाईट रुढीपरंपरांचा मैला स्वच्छ करण्यासाठी आता आरोग्य विभागाने कीर्तनकारांच्या प्रबोधनाचा पर्याय योजिला आहे. राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 20 कीर्तनकारांची निवड करण्यात आली असून हे कीर्तनकार महाराष्ट्रात आरोग्याचा जागर करणार आहेत.
पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा व वाईट रुढीपरंपरांचा पगडा समाजमनावर आहे.
 
एकीकडे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंधविश्वासामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विशेषत: अनेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर मात्र इतर राज्याच्या तुलनेत समाधानकारक नाही. हे प्रमाण कमी करण्यासाठी आजवर अनेक प्रयोग राबवले असले तरी त्याचे अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने आता आरोग्य विभाग आणि युनिसेफने कीर्तनकारांचा पर्याय योजिला आहे.
 
प्रत्येक कुटुंबात त्या त्या कुटुंबातील वडीलधारी मंडळीचे लोक ऐकत असतात. त्यामुळे वडीलधारी मंडळी जागृत झाल्यास त्याचा कुटुंबावरही परिणाम होतो. ही मंडळी कीर्तनाचे रसग्रहण अधिक प्रमाणात करते. त्यातून त्यांच्या मनावर विचारही प्रभावीपणे रुजतात. हीच बाब लक्षात घेऊन हा पर्याय शासनाने निवडला आहे.त्यासाठी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाशजी बोदले महाराज यांच्या सहयोगातून प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या त्या भागातील 20 प्रभावी कीर्तनकारांची निवड करण्यात आली आहे. या कीर्तनकारांना राज्यातील महसूल विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
 
पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या कीर्तनकारांसाठी युनिसेफ व आरोग्य विभागाने स्वतंत्र पुस्तिका तयार केली आहे. त्यात त्या त्या भागात समाजमनावर कोणत्या अंधश्रद्धा व रुढीपरंपरा आरोग्याला बाधक आहेत त्याची यादी तसेच सुदृढ आरोग्यासाठी पुराणात कुठले संदर्भ आहेत. त्याची माहिती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज यांच्यासह इतर संतांनी आरोग्यासंदर्भात दिलेले उपदेश याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीची सांगड घालून संबंधित कीर्तनकारांनी आपला प्रबोधनाचा ढाचा तयार केला आहे. हे कीर्तनकार आता गावोगावी जाऊन समाजमनाचा जागर करणार आहेत.
 
जनजागरण करण्याची मोहीम
मानवी जीवनात गर्भधारणेपासून तर दोन वर्षापर्यंत म्हणजे पहिले एक हजार दिवस हे महत्त्वाचे असतात. याच काळात शरीराची आणि बुद्धीचीही बांधणी होत असते. त्यामुळे या काळात घ्यावयाची काळजी महत्त्वाची आहे. याशिवाय बालविवाहाचे आणि कमी वयात महिलांना मूल होण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबतची जागृती होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कीर्तनातून यासंदर्भातील पुराण व संतांचे संदर्भ घेऊन जनजागरण करण्याची ही मोहीम आहे.
-डॉ.गोपाल पंडगे, कार्यकारी अधिकारी, युनिसेफ