शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण रोखण्यासाठी आता कीर्तनकारांचा आधार

By admin | Updated: January 13, 2017 17:41 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 20 कीर्तनकार प्रबोधनाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती करणार आहेत. आरोग्य विभागाकडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत/ रमाकांत पाटील

नंदुरबार, दि. 13 - समाज मनावर घट्ट चिकटून बसलेल्या अंधश्रद्धा आणि वाईट रुढीपरंपरांचा मैला स्वच्छ करण्यासाठी आता आरोग्य विभागाने कीर्तनकारांच्या प्रबोधनाचा पर्याय योजिला आहे. राज्यातील माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 20 कीर्तनकारांची निवड करण्यात आली असून हे कीर्तनकार महाराष्ट्रात आरोग्याचा जागर करणार आहेत.
पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा व वाईट रुढीपरंपरांचा पगडा समाजमनावर आहे.
 
एकीकडे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंधविश्वासामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विशेषत: अनेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर मात्र इतर राज्याच्या तुलनेत समाधानकारक नाही. हे प्रमाण कमी करण्यासाठी आजवर अनेक प्रयोग राबवले असले तरी त्याचे अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने आता आरोग्य विभाग आणि युनिसेफने कीर्तनकारांचा पर्याय योजिला आहे.
 
प्रत्येक कुटुंबात त्या त्या कुटुंबातील वडीलधारी मंडळीचे लोक ऐकत असतात. त्यामुळे वडीलधारी मंडळी जागृत झाल्यास त्याचा कुटुंबावरही परिणाम होतो. ही मंडळी कीर्तनाचे रसग्रहण अधिक प्रमाणात करते. त्यातून त्यांच्या मनावर विचारही प्रभावीपणे रुजतात. हीच बाब लक्षात घेऊन हा पर्याय शासनाने निवडला आहे.त्यासाठी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाशजी बोदले महाराज यांच्या सहयोगातून प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या त्या भागातील 20 प्रभावी कीर्तनकारांची निवड करण्यात आली आहे. या कीर्तनकारांना राज्यातील महसूल विभागनिहाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
 
पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती विभागाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या कीर्तनकारांसाठी युनिसेफ व आरोग्य विभागाने स्वतंत्र पुस्तिका तयार केली आहे. त्यात त्या त्या भागात समाजमनावर कोणत्या अंधश्रद्धा व रुढीपरंपरा आरोग्याला बाधक आहेत त्याची यादी तसेच सुदृढ आरोग्यासाठी पुराणात कुठले संदर्भ आहेत. त्याची माहिती संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज यांच्यासह इतर संतांनी आरोग्यासंदर्भात दिलेले उपदेश याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीची सांगड घालून संबंधित कीर्तनकारांनी आपला प्रबोधनाचा ढाचा तयार केला आहे. हे कीर्तनकार आता गावोगावी जाऊन समाजमनाचा जागर करणार आहेत.
 
जनजागरण करण्याची मोहीम
मानवी जीवनात गर्भधारणेपासून तर दोन वर्षापर्यंत म्हणजे पहिले एक हजार दिवस हे महत्त्वाचे असतात. याच काळात शरीराची आणि बुद्धीचीही बांधणी होत असते. त्यामुळे या काळात घ्यावयाची काळजी महत्त्वाची आहे. याशिवाय बालविवाहाचे आणि कमी वयात महिलांना मूल होण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबतची जागृती होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कीर्तनातून यासंदर्भातील पुराण व संतांचे संदर्भ घेऊन जनजागरण करण्याची ही मोहीम आहे.
-डॉ.गोपाल पंडगे, कार्यकारी अधिकारी, युनिसेफ