शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

खडसेंनंतर आता महाजन गोत्यात

By admin | Updated: June 17, 2016 06:05 IST

भूखंड खरेदीच्या वादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे लागले असतानाच, आता जलसंपदामंत्री

मुंबई/ जळगाव : भूखंड खरेदीच्या वादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे लागले असतानाच, आता जलसंपदामंत्री गिरीश महाजनही एका जमिनीवरून अडचणीत सापडले आहेत.निवडणूक शपथपत्रात जमिनीची माहिती लपविल्याने मंत्री महाजन यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी डिगंबर केशव पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. २०१४ मध्ये गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र, नामनिर्देशन पत्रासोबत त्यांनी भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील २ हेक्टर ०.८ आर ही जमीन त्यांच्या नावे असताना शपथपत्रात त्याचा उल्लेख केला नाही. भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२५ (अ) प्रमाणे खोटे शपथपत्र दाखल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे महाजन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी आयोगाकडे केली आहे. डी. के. पाटील यांनी २०१४ मध्ये महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली होती.

महाजन यांची निवडणूक रद्द करा : राष्ट्रवादीजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जमिनीबाबतची माहिती निवडणूक आयोगासमोर लपवली आहे. शिवाय, या जमीनी जबरदस्तीने हडप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्र परिषदेत केला. महाजन यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

तावडेंची हकालपट्टी करा - विद्यार्थ्यांच्या कलचाचणी अहवालावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून स्वत:चा फोटो छापला. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे तावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहे प्रकरण?जळगाव-औरंगाबाद महामार्गावर देवपिंप्री फाट्याजवळ ही जमीन आहे. २००१ मध्ये एकनाथ खडसे, गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवाणी व इतरांनी मिळून तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना, मानपूर उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी मानपूर येथील गट क्र.१२१ व १२२ मधील ८१ आर एकर जागा खरेदी केली. गिरीश महाजन यांच्या नावावर असलेली जागा सुपडू जंगलू तायडे व गोविंदा तायडे या दोघांच्या नावे ५० टक्के व भास्कर सुका तायडे व राजाराम सुका तायडे, बाजीराव सुका तायडे यांच्या नावे विभागून आहे. कारखान्याच्या जागेवर आता फळबाग लागवड केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगल्या मोबदल्याचे तसेच मुलांच्या नोकरीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे आमची जमीन आम्हाला परत करावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.जमीन परत करू - महाजन

साखर कारखान्यासाठी या जागेची खरेदी झाली होती. परंतु कारखान्याच्या नावे २५ एकर जमीन लावून उर्वरित जमीन माझ्यासह काही संचालक व खडसे कुटुंबीयांच्या नावावर लावण्यात आली. ही जागा माझ्या नावावर असल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे तीन निवडणुकांच्या शपथपत्रात त्याची माहिती दिली नाही. या जमिनीतून कोणतेही उत्पन्न घेत नसल्याने प्राप्तीकर खात्याच्या विवरणपत्रातही उल्लेख नाही, शेतकऱ्यांची मागणी असेल तर ती जमीन परत करू, असे गिरीश महाजन म्हणाले.