शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

खडसेंनंतर आता महाजन गोत्यात

By admin | Updated: June 17, 2016 06:05 IST

भूखंड खरेदीच्या वादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे लागले असतानाच, आता जलसंपदामंत्री

मुंबई/ जळगाव : भूखंड खरेदीच्या वादातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरी बसावे लागले असतानाच, आता जलसंपदामंत्री गिरीश महाजनही एका जमिनीवरून अडचणीत सापडले आहेत.निवडणूक शपथपत्रात जमिनीची माहिती लपविल्याने मंत्री महाजन यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी डिगंबर केशव पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. २०१४ मध्ये गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र, नामनिर्देशन पत्रासोबत त्यांनी भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील २ हेक्टर ०.८ आर ही जमीन त्यांच्या नावे असताना शपथपत्रात त्याचा उल्लेख केला नाही. भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १२५ (अ) प्रमाणे खोटे शपथपत्र दाखल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे महाजन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी आयोगाकडे केली आहे. डी. के. पाटील यांनी २०१४ मध्ये महाजन यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली होती.

महाजन यांची निवडणूक रद्द करा : राष्ट्रवादीजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जमिनीबाबतची माहिती निवडणूक आयोगासमोर लपवली आहे. शिवाय, या जमीनी जबरदस्तीने हडप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्र परिषदेत केला. महाजन यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

तावडेंची हकालपट्टी करा - विद्यार्थ्यांच्या कलचाचणी अहवालावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून स्वत:चा फोटो छापला. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे तावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)काय आहे प्रकरण?जळगाव-औरंगाबाद महामार्गावर देवपिंप्री फाट्याजवळ ही जमीन आहे. २००१ मध्ये एकनाथ खडसे, गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, गुरुमुख जगवाणी व इतरांनी मिळून तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना, मानपूर उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी मानपूर येथील गट क्र.१२१ व १२२ मधील ८१ आर एकर जागा खरेदी केली. गिरीश महाजन यांच्या नावावर असलेली जागा सुपडू जंगलू तायडे व गोविंदा तायडे या दोघांच्या नावे ५० टक्के व भास्कर सुका तायडे व राजाराम सुका तायडे, बाजीराव सुका तायडे यांच्या नावे विभागून आहे. कारखान्याच्या जागेवर आता फळबाग लागवड केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगल्या मोबदल्याचे तसेच मुलांच्या नोकरीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे आमची जमीन आम्हाला परत करावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.जमीन परत करू - महाजन

साखर कारखान्यासाठी या जागेची खरेदी झाली होती. परंतु कारखान्याच्या नावे २५ एकर जमीन लावून उर्वरित जमीन माझ्यासह काही संचालक व खडसे कुटुंबीयांच्या नावावर लावण्यात आली. ही जागा माझ्या नावावर असल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे तीन निवडणुकांच्या शपथपत्रात त्याची माहिती दिली नाही. या जमिनीतून कोणतेही उत्पन्न घेत नसल्याने प्राप्तीकर खात्याच्या विवरणपत्रातही उल्लेख नाही, शेतकऱ्यांची मागणी असेल तर ती जमीन परत करू, असे गिरीश महाजन म्हणाले.