शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

आता भारत जोडो साहित्य दिंडी; राहुल गांधींच्या यात्रेला १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांचा पाठिंबा 

By भारत दाढेल | Updated: November 9, 2022 08:00 IST

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत.

नांदेड :

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू भ्रम निर्माण करून नवे आदर्श निर्माण केले जात आहेत. या विकृतीकरणाचा संसर्ग वाडी, वस्ती, तांडे, खेड्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर लेखक, कवी, चित्रकार, कलावंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. सहिष्णू भारत घडविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने साहित्यिक मंडळी पुढे आली असून, त्यांनी ‘भारत जोडो साहित्य दिंडी’ स्थापन केली आहे.  

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेला राज्यातील १२० साहित्यिक, विचारवंत, कलावंतांनी पाठिंबा दिला असून यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, कलावंत नांदेड येथे दाखल झाले आहेत. या दिंडीचे निमंत्रक प्रा. डॉ. दत्ता भगत, डॉ. जगदीश कदम, प्रा. श्रीकांत देशमुख,  डॉ. विशाल पतंगे, विजय वाकोडे  हे आहेत. या समितीच्या वतीने मंगळवारी स्थानिक साहित्यिकांची बैठक घेण्यात आली.

या साहित्यिकांचा पाठिंबा  वसंत आबाजी डहाके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, रा.रं. बोराडे, कौतिकराव ठाले पाटील, अनुराधा पाटील, फ.मुं. शिंदे, डॉ. लीला शिंदे, संदेश भंडारे, प्रा. राजन गवस, सुमती लांडे, प्रवीण बांदेकर, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, प्रा. सदानंद देशमुख, भु.द. वाडीकर, कवी पी. विठ्ठल, डॉ. शेषराव मोहिते, डॉ. नागोराव कुंभार, लोकनाथ यशवंत, डॉ. श्रीराम गव्हाणे, शिवा अंबुलगेकर, डॉ. उत्तम सावंत, प्रा. डॉ. मारोती कसाब, डॉ. रामचंद्र काळुंखे आदी यात्रेत सहभागी होतील.  

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील साहित्यिक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. कळमनुरी येथे १२ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेऊन साहित्यिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, तसेच, त्यांना निवेदन देणार आहेत.   - डॉ. जगदीश कदम, समन्वयक

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी