शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

दानवे, मुंडेंच्या कारखान्यांसह १६ कारखान्यांना नोटिसा

By admin | Updated: January 16, 2015 05:59 IST

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना साखर कारखानदारांनी पिळवणुकीचे धोरण सुरूच ठेवले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना साखर कारखानदारांनी पिळवणुकीचे धोरण सुरूच ठेवले आहे. विभागात एकूण २३ कारखाने सुरू असून, त्यापैकी १६ कारखान्यांकडून उसाला निर्धारित शासकीय दरानुसार भाव देण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आ. राजेश टोपे, आ. अमरसिंह पंडित यांच्या कारखान्यांसह आजी-माजी मंत्री आणि आमदारांच्या कारखान्यांचा समावेश आहे.औरंगाबाद विभागात एकूण ४८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी यंदा २३ कारखाने उसाचे गाळप करीत आहेत. यापैकी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव न देणाऱ्या १६ कारखान्यांना साखर उपसंचालकांनी नोटिसा दिल्या आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्णातील वैद्यनाथ, जयभवानी आणि माजलगाव या सहकारी, येडेश्वरी आणि एनएसएल खाजगी, जालना जिल्ह्णातील समर्थ युनिट-१ आणि २, समृद्धी श्रद्धा एनर्जी, रामेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्धेश्वर, संत एकनाथ सहकारी, बारामती अ‍ॅग्रो, मुक्तेश्वर खाजगी, जळगावमधील मधुकर, चोपडा, नंदुरबार -आॅस्टोरिया या साखर कारखान्यांना नोटिसा दिल्या आहेत. विशेष म्हणजे नोटीस दिलेल्या कारखान्यांचे संचालक आणि मालक काही आजी-माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आहेत. साखरसम्राटांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे धोरण कायम ठेवल्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत. कारखान्याचे संचालक आणि मालकांविरुद्ध शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)