शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गोरक्षकप्रकरणी हायकोर्टाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:51 IST

गोमांस बाळगल्याच्या किंवा खात असल्याच्या संशयावरून, स्वयंघोषित गोरक्षकांकडून सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोमांस बाळगल्याच्या किंवा खात असल्याच्या संशयावरून, स्वयंघोषित गोरक्षकांकडून सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे.हेल्पलाइन व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यांच्या परिसरातील गोरक्षकांची यादीही उपलब्ध असावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते शदाब पटेल यांनी न्यायालयाला केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली.केवळ गोमांस बाळगल्याच्या, खाल्ल्याच्या किंवा विक्री करण्याच्या संशयावरून, राज्यात अनेक ठिकाणी स्वयंघोषित गोरक्षकांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला आहे. बकरी ईदच्या काळात हे हल्ले वाढण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील गोरक्षकांची यादी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.