शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जास्त काहीच नाही; आमचे काम परत द्या!

By admin | Updated: December 17, 2014 00:29 IST

आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी धरणे - आंदोलन, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण याद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच

कामगारांची मागणी : १५ महिलांचे आमरण तर ६० पुरुषांचे साखळी उपोषण सुरूगणेश खवसे - नागपूर आपल्या न्याय्य मागण्या पदरी पाडून घेण्यासाठी धरणे - आंदोलन, लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण याद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अशाच प्रकारचे चित्र सध्या पटवर्धन मैदानात दिसून येते. तेथे गेल्या नऊ दिवसांपासून १५ महिलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु, आतापर्यंत त्यांच्याकडे कुणीही फिरकले नाही. सोबत आणलेले आणि खिशात होते ते पैसेही संपले. आता पुरुषांच्या खाण्याचेही ‘वांधे’ झाले आहेत. येथून जागा सोडली तर मागण्या पूर्ण होणार नाही अन्् येथे थांबतो म्हटले तर उपाशीच थांबावे लागणार... करावे तर काय, अशा पेचात अन्यायग्रस्त कामगार सापडले आहेत. ‘आम्हाला आमचे काम परत द्या’ अशी मागणी त्यांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पेंच पाटबंधारेच्या कांद्री उपविभागात पाणी वाटप करण्याचे काम करणाऱ्या कामगारांना २००१ मध्ये कामावरून कमी करण्यात आले. कामावर परत घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगारांनी जनसमस्या अन्यायग्रस्त समिती संघटनेच्या छताखाली साखळी आणि महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. पवनी तालुक्यातील कांद्री (जि. भंडारा) येथे पेंच पाटबंधारे उपविभागात सुमारे हजार कामगार कामावर होते. कालव्यातून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात पाणी सोडण्याचे काम त्यांच्याकडे होते. काम सुरू असताना अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ या कामगार कुटुंबीयांवर आली. याबाबत बरेचदा निवेदने दिली, आंदोलने केली. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. ‘जास्त काहीच नको; आम्हाला आमचे काम द्या’ अशी मागणी या कुटुंबीयांनी केली आहे. शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, कामावरून कमी केलेल्या कामगारांना १० लाख रुपये मोबदला देण्यात यावा, ज्या कामगाराचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घ्यावे, त्याच्या पत्नीला पेन्शन लागू करावी, प्रत्येक कामगार कुटुंबाला बी.पी.एल. कार्ड देण्यात यावे आदी मागण्यांसाठी या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. आमरण उपोषण करणाऱ्यांमध्ये मैना मुटकुरे, लता झंजाळ, मंजू सवालाखे, रेखा मसरने, सुनीता सवालाखे, समता बशिने, फुलवंता सवालाखे, लता माटे, अनंदा निंबार्ते, शीला हारगुडे, गोपिका भुते, मीरा भोयर, बेबी पुरोहित, विमला भोयर यांचा समावेश आहे. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. यापैकी लता झंजाळ या महिलेची तीन दिवसांपूर्वी प्रकृती खालावली होती. त्यामुळे तिला पोलिसांनी लगेच मेडिकलमध्ये भरती केले. तेथे उपचार केल्यानंतर तिने पुन्हा उपोषण सुरू केले. या महिलांसोबतच नानाजी कुथे, सीताराम झंजाळ, चंद्रशेखर मानकर, धरमराम गऱ्हाडे, गजानन बावणे, विठ्ठल मते, प्रमोद घरजाले, ज्ञानेश्वर वैद्य, शेखर झंजाळ, अमर निंबार्ते, देवसिंग नागपुरे, जयदेव झंजाळ, भालचंद्र खरवडे, सहादेव माटे, चंद्रभान झंजाळ, गणेश मसरके, विजय सवालाखे, रामचंद्र पिल्लारे यांच्यासह इतर पुरुष साखळी उपोषण करीत आहेत. आता पुरुषही आमरण उपोषणाच्या पावित्र्यातपवनी तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातून हे कामगार आंदोलनस्थळी आले आहेत. त्यांनी येताना थोडेबहुत पैसे आणले होते. पाच-सहा दिवस पैसे पुरले. चहा-नाश्ता कसातरी भागला. येतानाच तांदळाचा एक कट्टा आणला होता. मात्र तो किती दिवस पुरणार. आता खिशात पैसे नाही अन् तांदूळही संपले. एवढेच काय तर चहा पिण्याकरिता पैसे नाही. गावाला परत जाण्याचाही प्रश्नच आहे. मागणी पूर्ण झालेली नाही. अशात पैशाची जुळवाजुळव करतो म्हटले तर जागा सोडावी लागणार. जागा सोडली तर आंदोलन संपले असे वाटेल. दुसरीकडे जागा सोडली नाही तर पोटात अन्न जाणार नाही. अशा पेचात कामगार सापडले आहेत. मात्र पोटातली भूक पोटातच ठेवून आता महिलांसोबत आपणही आमरण उपोषण सुरू करू, असा निर्धार कामगारांनी केला आहे.