शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
3
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
4
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
5
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
6
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
7
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
8
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
9
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
10
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
11
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
12
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
13
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
14
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
15
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
16
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
17
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
18
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
19
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
20
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."

महिला नव्हे, परिवार आयोग!

By admin | Published: February 14, 2016 2:39 AM

एक महिला शिकली की तिचं अख्खं कुटुंब शहाणं होतं, असं म्हणतात, त्यामुळेच महिला आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भविष्यात प्रबोधनावर भर देऊन आयोग वाटचाल करेल.

(निमित्तमात्र )

- विजया जांगळे

एक महिला शिकली की तिचं अख्खं कुटुंब शहाणं होतं, असं म्हणतात, त्यामुळेच महिला आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. भविष्यात प्रबोधनावर भर देऊन आयोग वाटचाल करेल. एका महिलेची प्रगती म्हणजे संपूर्ण कुटुंबाची प्रगती या सूत्रानुसार हा आयोग केवळ महिला आयोग न राहता परिवार आयोग ठरावा, यासाठी प्रयत्न केले जातील... सांगत आहेत, राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष विजया रहाटकर.महिला आयोग कोणत्या प्रश्नांना प्राधान्य देईल?महिलांची सुरक्षितता हे आजही आपल्या समाजापुढे मोठे आव्हान आहे. भ्रूणावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत आणि गावखेड्यातल्या घरापासून ते कॉर्पोरेट आॅफिसपर्यंत विविध वयोगटांतील आणि सामाजिक स्तरांतील महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोजच्या रोज उघडकीस येतात. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागेल. महिलांसंदर्भातील बहुतेक प्रश्न हे प्रबोधनाने सुटणारे आहेत, मात्र त्यासाठी केवळ महिलांचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यामुळे महिला आयोगाला प्रबोधनावर भर द्यावा लागेल. शनिचौथरा आणि हाजी अली येथे महिलांना प्रवेश देण्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. प्रवेश द्यावा, असं वाटतं का?आपल्या समाजात महिलेला उपासनेचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. कुठेही तिला कमी लेखलेलं नाही. राजस्थानातील एका शनिमंदिराची संपूर्ण जबाबदारी गेल्या तीन पिढ्यांपासून महिलांवरच असल्याचं नुकतंच ऐकिवात आलं. मात्र तरीही वर्षानुवर्षांच्या रूढींसंदर्भात निर्णय घेताना समन्वयाचा मार्ग स्वीकारायला हवा. विशेषत: जिथे अनेकांच्या श्रद्धा जोडल्या गेल्या आहेत, त्या मुद्द्यांवरचा निर्णय हा दोन्ही बाजूंची मतं विचारात घेऊनच व्हावा. वाद न घालता समजूतदारपणे शाश्वत मार्ग काढला पाहिजे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करण्यात यावं असा एक मतप्रवाह आहे. हे योग्य ठरेल, असं वाटतं का?यावर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत घेणं अधिक सयुक्तिक ठरेल, मात्र गर्भलिंग निदानाला परवानगी दिल्यास ज्या मातांच्या गर्भात मुलगी वाढत आहे, त्यांची नोंद ठेवावी लागेल. त्या महिलेची योग्य काळजी घेतली जाईल, विनाकारण गर्भपात केला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. त्यासंदर्भात विशेष कायदे करावे लागतील. मुळात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे काचेचं भांडं असल्या भ्रामक कल्पना जोवर दूर होत नाहीत तोवर कायदे निष्प्रभच ठरत राहणार. मुलगीसुद्धा म्हातारपणाची काठी बनू शकते, हे सोदाहरण पटवून देणं गरजेचं आहे. पालकांची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या मुलींची आणि मुलगाच हवा असा हट्ट न धरता आपल्या एकुलत्या एका मुलीला विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकांची उदाहरणं समाजासमोर आणायला हवीत. जातपंचायतींच्या जाचाला महिलाच मोठ्या प्रमाणात बळी पडतात. ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी काय करावं लागेल?खरंतर नवी पिढी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आली आहे. नुकतंच येवल्यात एक प्रकरण घडलं. त्यात विधवा आईच्या पाठीशी तिची मुलगी उभी राहिली. नव्या पिढीतल्या मुली जातपंचायतीच्या विरोधात आवाज उठवू लागल्या आहेत आणि हे समाजाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक चिन्ह आहे. गांजलेल्या महिलांना संरक्षण आणि कायदेशीर मदत मिळवून देण्याचे प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून केले जातील. या व्यवस्थेची पाळंमुळं अनेक वर्षांपासून खोलवर रुजली आहेत. ती एका दिवसात उखडून टाकता येणार नाहीत. त्यासाठी सातत्याने आणि सर्व स्तरांवर काम करावं लागेल. सर्व स्तरांतील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी महिला आयोग काय करेल?महिला आयोगापर्यंत पोहोचणं अगदी तळागाळातल्या महिलेलाही शक्य व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी अगदी तालुका स्तरापर्यंत पोहोचावं लागेल. महिला आमच्यापर्यंत पोहोचण्याची वाट न पाहता राज्यभर दौरे करून आम्हालाच त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देशभर फिरताना असं लक्षात आलं की, शहरी आणि ग्रामीण महिलांच्या समस्या बऱ्याच वेगळ्या आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची माध्यमंही वेगळी आहेत. ग्रामीण भागांतील महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीवच नाही. त्यांच्यासाठीचे कायदे आणि सरकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. करिअर आणि घर अशी तारेवरची कसरत करणाऱ्या शहरी महिलांच्या समस्या वेगळ्या आहेत. वयोगटाप्रमाणेही समस्या बदलत जातात. या सर्वांना कायदे आणि योजनांची माहिती सोप्या भाषेत उपलब्ध करून द्यावी लागेल. शहरी महिलांपर्यंत ती सोशल मीडिया आणि अन्य प्रसिद्धिमाध्यामांतून पोहोचवता येईल, तर ग्रामीण महिलांसाठी ही भूमिका आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, पोलीस स्टेशन्स बजावू शकतील. शाळाशाळांत जनजागृतीपर कार्यक्रम राबवावे लागतील. लहान वयातच मुला-मुलींचं प्रबोधन होणं एकूणच समाजाच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.