शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

"अडीच वर्षं नव्हे, तर 6 महिन्यांतसुद्धा..."; मंत्रीपदासंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय घडलं? शिरसाटांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:19 IST

शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शिरसाट? -शपथविधी समारंभानंतर, अडीच-अडीच वर्षांची चर्चा झाल्याचे समजते, काय आहे यातील सत्य? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, शिरसाट म्हणाले, "हो... हे सत्य आहे. शिंदे साहेबांनी सर्वांना बोलावून आमची मिटिंग घेतली आणि सर्वांना सांगितले की, आपण चांगले काम करायला हवे. हा अडीच वर्षां कार्यकाळ असणार आहे. जर चांगले काम केले नाही, तर अडीच वर्षांचीही आवश्यकता नाही. सहा महिन्यांतही तुम्हाला घरी बसवले जाईल, असा थेट इशारा त्यांनी सर्वच मंत्र्यांना दिला आहे." 

यावेळी, मिळालेल्या मंत्रीपदासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, मला मंत्रीपद मिळेल याची चर्चा होती. अखेर शिंदे साहेबांनी मला न्याय देण्याची भूमिका घेतली, आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मला मिळालेल्या संधीचा योग्य वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देता येईल या भावनेतून मी काम करणार आहे."

उदय सामंतही स्पष्टच बोलले -अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, "राज्याचे आमच्या शिवसेनेचे नेते, अडीच वर्ष कशाला? उद्या जर दोन महिन्यांनंतर आम्ही परफॉर्मन्स दिला नाही आणि त्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळातून थांबावे लागेल, तरदेखील आम्ही थांबायला हवे. त्यासाठी अडीच वर्षं कशाला? आमची फरफॉर्मन्स देण्याची जबाबदारी आहे. आमच्यावर चांगले काम करण्याची जी जबाबदारी शिंदे साहेबांनी टाकली आहे, त्याला आम्ही पात्र ठरायला हवे. जर आम्ही पात्र ठरलो नाही आणि शिंदे साहेबांनी दोन महिन्यांनी जरी सांगितले की, थांबलं हवे तर आम्ही थांबायला हवे. त्यासाठी प्रतिज्ञापत्राची काय गर?" 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना