शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

"अडीच वर्षं नव्हे, तर 6 महिन्यांतसुद्धा..."; मंत्रीपदासंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय घडलं? शिरसाटांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:19 IST

शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शिरसाट? -शपथविधी समारंभानंतर, अडीच-अडीच वर्षांची चर्चा झाल्याचे समजते, काय आहे यातील सत्य? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, शिरसाट म्हणाले, "हो... हे सत्य आहे. शिंदे साहेबांनी सर्वांना बोलावून आमची मिटिंग घेतली आणि सर्वांना सांगितले की, आपण चांगले काम करायला हवे. हा अडीच वर्षां कार्यकाळ असणार आहे. जर चांगले काम केले नाही, तर अडीच वर्षांचीही आवश्यकता नाही. सहा महिन्यांतही तुम्हाला घरी बसवले जाईल, असा थेट इशारा त्यांनी सर्वच मंत्र्यांना दिला आहे." 

यावेळी, मिळालेल्या मंत्रीपदासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, मला मंत्रीपद मिळेल याची चर्चा होती. अखेर शिंदे साहेबांनी मला न्याय देण्याची भूमिका घेतली, आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मला मिळालेल्या संधीचा योग्य वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देता येईल या भावनेतून मी काम करणार आहे."

उदय सामंतही स्पष्टच बोलले -अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, "राज्याचे आमच्या शिवसेनेचे नेते, अडीच वर्ष कशाला? उद्या जर दोन महिन्यांनंतर आम्ही परफॉर्मन्स दिला नाही आणि त्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळातून थांबावे लागेल, तरदेखील आम्ही थांबायला हवे. त्यासाठी अडीच वर्षं कशाला? आमची फरफॉर्मन्स देण्याची जबाबदारी आहे. आमच्यावर चांगले काम करण्याची जी जबाबदारी शिंदे साहेबांनी टाकली आहे, त्याला आम्ही पात्र ठरायला हवे. जर आम्ही पात्र ठरलो नाही आणि शिंदे साहेबांनी दोन महिन्यांनी जरी सांगितले की, थांबलं हवे तर आम्ही थांबायला हवे. त्यासाठी प्रतिज्ञापत्राची काय गर?" 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना