शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"अडीच वर्षं नव्हे, तर 6 महिन्यांतसुद्धा..."; मंत्रीपदासंदर्भात शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत काय घडलं? शिरसाटांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:19 IST

शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 12 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेत मंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलाची माहिती समोर आली होती. यासंदर्भात आता नवे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. "हो... हे सत्य आहे," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले शिरसाट? -शपथविधी समारंभानंतर, अडीच-अडीच वर्षांची चर्चा झाल्याचे समजते, काय आहे यातील सत्य? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, शिरसाट म्हणाले, "हो... हे सत्य आहे. शिंदे साहेबांनी सर्वांना बोलावून आमची मिटिंग घेतली आणि सर्वांना सांगितले की, आपण चांगले काम करायला हवे. हा अडीच वर्षां कार्यकाळ असणार आहे. जर चांगले काम केले नाही, तर अडीच वर्षांचीही आवश्यकता नाही. सहा महिन्यांतही तुम्हाला घरी बसवले जाईल, असा थेट इशारा त्यांनी सर्वच मंत्र्यांना दिला आहे." 

यावेळी, मिळालेल्या मंत्रीपदासंदर्भात बोलताना शिरसाट म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, मला मंत्रीपद मिळेल याची चर्चा होती. अखेर शिंदे साहेबांनी मला न्याय देण्याची भूमिका घेतली, आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मला मिळालेल्या संधीचा योग्य वापर कसा होईल आणि लोकांना न्याय कसा देता येईल या भावनेतून मी काम करणार आहे."

उदय सामंतही स्पष्टच बोलले -अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले, "राज्याचे आमच्या शिवसेनेचे नेते, अडीच वर्ष कशाला? उद्या जर दोन महिन्यांनंतर आम्ही परफॉर्मन्स दिला नाही आणि त्यांनी सांगितले की, मंत्रीमंडळातून थांबावे लागेल, तरदेखील आम्ही थांबायला हवे. त्यासाठी अडीच वर्षं कशाला? आमची फरफॉर्मन्स देण्याची जबाबदारी आहे. आमच्यावर चांगले काम करण्याची जी जबाबदारी शिंदे साहेबांनी टाकली आहे, त्याला आम्ही पात्र ठरायला हवे. जर आम्ही पात्र ठरलो नाही आणि शिंदे साहेबांनी दोन महिन्यांनी जरी सांगितले की, थांबलं हवे तर आम्ही थांबायला हवे. त्यासाठी प्रतिज्ञापत्राची काय गर?" 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना