शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

यंदाही ‘अच्छे दिन’ नाहीच

By admin | Updated: July 3, 2014 01:02 IST

अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा जास्त तणाव असेल तो महाविद्यालयांच्या प्रशासनावर.

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : आतापर्यंत केवळ ६५ टक्केच अर्ज दाखलनागपूर : अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा जास्त तणाव असेल तो महाविद्यालयांच्या प्रशासनावर. आतापर्यंत नागपूर विभागात एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत केवळ ६५ टक्के अर्जांची छाननी झाली आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या निरुत्साहामुळे यंदादेखील मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या राहणार व अर्ज दाखल केलेल्या प्रत्येकाला सहजपणे प्रवेश मिळणार, असेच चित्र दिसून येत आहे. परंतु कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांच्या चिंतेत निश्चितपणे वाढ झाली आहे.२३ जूनपासून अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली होती. शहरात मोठ्या प्रमाणावर एआरसी केंद्रे असूनदेखील विद्यार्थ्यांची म्हणावी तशी गर्दी झालीच नव्हती. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बुधवार २ जुलैपर्यंत १५,८१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जर विभागात उपलब्ध असलेल्या २४,३९२ हजार जागांच्या तुलनेत याची टक्केवारी काढली तर ती अवघी ६४.८५ टक्के भरते. ३ जुलै रोजी ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करून कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे सत्यापन करण्याची अखेरची तारीख आहे.व्यवस्थापन कोट्यावर भिस्तमागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ कमी झाली आहे. नागपूर विभागात अभियांत्रिकीची ५७ महाविद्यालये आहेत.यातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून जागा भरण्यावरच भर ठेवला होता.(प्रतिनिधी)अर्ज दाखल करण्याची मुदत वाढणार?मागील दोन वर्षांप्रमाणे यंदादेखील इतक्या कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. बारावीच्या निकालात सुमारे १६ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतील, अशी शक्यता होती. परंतु हे अंदाज चुकल्याचेच अर्जांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाकडे बुधवारपर्यंत तरी कुठलीही सूचना आली नव्हती.