शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

यंदाही ‘अच्छे दिन’ नाहीच

By admin | Updated: July 3, 2014 01:02 IST

अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा जास्त तणाव असेल तो महाविद्यालयांच्या प्रशासनावर.

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया : आतापर्यंत केवळ ६५ टक्केच अर्ज दाखलनागपूर : अभियांत्रिकीच्या केंद्रीभूत प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. मात्र विद्यार्थ्यांपेक्षा जास्त तणाव असेल तो महाविद्यालयांच्या प्रशासनावर. आतापर्यंत नागपूर विभागात एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत केवळ ६५ टक्के अर्जांची छाननी झाली आहे. एकूणच विद्यार्थ्यांच्या निरुत्साहामुळे यंदादेखील मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या राहणार व अर्ज दाखल केलेल्या प्रत्येकाला सहजपणे प्रवेश मिळणार, असेच चित्र दिसून येत आहे. परंतु कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांच्या चिंतेत निश्चितपणे वाढ झाली आहे.२३ जूनपासून अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली होती. शहरात मोठ्या प्रमाणावर एआरसी केंद्रे असूनदेखील विद्यार्थ्यांची म्हणावी तशी गर्दी झालीच नव्हती. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार बुधवार २ जुलैपर्यंत १५,८१९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जर विभागात उपलब्ध असलेल्या २४,३९२ हजार जागांच्या तुलनेत याची टक्केवारी काढली तर ती अवघी ६४.८५ टक्के भरते. ३ जुलै रोजी ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करून कागदपत्रांची पडताळणी व अर्जाचे सत्यापन करण्याची अखेरची तारीख आहे.व्यवस्थापन कोट्यावर भिस्तमागील काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची क्रेझ कमी झाली आहे. नागपूर विभागात अभियांत्रिकीची ५७ महाविद्यालये आहेत.यातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातून जागा भरण्यावरच भर ठेवला होता.(प्रतिनिधी)अर्ज दाखल करण्याची मुदत वाढणार?मागील दोन वर्षांप्रमाणे यंदादेखील इतक्या कमी प्रमाणात अर्ज आल्यामुळे महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. बारावीच्या निकालात सुमारे १६ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतील, अशी शक्यता होती. परंतु हे अंदाज चुकल्याचेच अर्जांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाकडे बुधवारपर्यंत तरी कुठलीही सूचना आली नव्हती.