शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही

By admin | Updated: October 29, 2015 01:18 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत.

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर चांगले प्रमाणपत्र देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, स्वत: फडणवीस स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू नेते आहेत. वर्षभराच्या काळात या सरकारने दोन आघाड्यांवर मात्र कौतुकास्पद काम केले, हे मान्य करावे लागेल. एक म्हणजे जलशिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याच्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न, तर दुसरे इंदू मिल आणि लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक. विशेषत: आघाडी सरकारने बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबितच ठेवला. नव्या सरकारने मात्र दोन्ही प्रश्न वर्षभरात तत्परतेने मार्गी लावले. शेतकरी आत्महत्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय. केवळ पैसे वाटून आत्महत्यांचे सत्र थांबणार नाही. त्यासाठी शाश्वत योजना आखण्याची आवश्यकता होती. फडणवीस सरकारने जलशिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत पाणी प्रश्न सोडविण्याची कटीबध्दता स्पष्ट केली आहे. धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आम्ही मोठे आंदोलन छेडले होते. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. भाजपाचे नेते बारामतीकरांचा पाहुणचार घेत आहेत. त्यांच्या सल्ल्याने कामकाज कराल, तर तुम्हालाही रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. जनता आता हुशार झाली आहे. सगळे दिसते आणि समजते. त्यामुळे जनतेला जी आश्वासने दिली, त्यांच्या पूर्ततेसाठीच सरकारने आपले लक्ष केंद्रित करायला हवे. - आ. महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष