शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

नोटाबंदी म्हणजे एकतर्फी दिशाहीन क्षेपणास्त्र

By admin | Updated: January 29, 2017 01:48 IST

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एकतर्फी दिशाहीन क्षेपणास्त्र असल्याची परखड टीका नोबेलविजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

मुंबई : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय म्हणजे एकतर्फी दिशाहीन क्षेपणास्त्र असल्याची परखड टीका नोबेलविजेते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केली. सेन यांनी नोटाबंदीवेळी लोकांना विचारात घेतले नसल्याचे सांगत, अशा क्षेपणास्त्रांचा सरकार वेळोवेळी मारा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.टाटा मेमोरियल रुग्णालयाने ७५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने कुलाबा येथे शनिवारी आयोजित ‘हेल्थकेअर कमोडिटी आॅर बेसिक ह्युमन नीड?’ या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील खासगी डॉक्टरांकडून गरीब रुग्णांचे होणारे शोषण बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. देशातील राजकीय निर्णयांमध्ये सामान्य नागरिकांच्या मतांवर आधारित असले पाहिजे, असे सांगत, आजच्या घडीला ‘आरोग्यसेवा’ क्षेत्रात सरकारतर्फे सर्वात कमी गुंतवणूक केली जात असल्याचे स्पष्ट केले. आरोग्यसेवा क्षेत्रात प्रगती होण्यासाठी राज्य शासनाने परिपक्व भूमिका घेतली पाहिजे, असे सेन यांनी सुचविले.आपल्या देशात अजूनही आरोग्यसेवा क्षेत्रात उत्तम सेवा- सुविधा पुरविल्या जात नाही, ही देशाची सर्वांत मोठी हार असल्याची बाब सेन यांनी अधोरेखित केली. आपल्या देशाचे दरडोई उत्त्पन्न जास्त असून, आरोग्यसेवा क्षेत्रात पाकिस्तानसारख्या देशानंतर आपले नाव घेतले जाते, ही गांभीर्याची बाब असल्याचे सेन यांनी म्हटले. बांग्लादेश आणि नेपाळ हे दोन्ही देश भारताच्या तुलनेत आरोग्यसेवा क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य म्हणजे सर्वांत गरीब अर्थव्यवस्था असणारा बांग्लादेश आरोग्यसेवा क्षेत्रात बालमृत्यू, लसीकरण, स्वच्छताविषय सुविधा, कुपोषण आणि शौचालयांची उपलब्धता या सर्वच बाबतीत भारतापेक्षा आघाडीवर आहे. आरोग्यसेवेविषयी बोलताना सेन यांनी देशात आर्थिक प्रगतीचा सामाजिक परिणाम मर्यादित ठेवल्यास, आरोग्यसेवा क्षेत्राचा विकास होण्यास निश्चित मदत होईल असे त्यांनी सांगितले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेन यांनी आरोग्यसेवा क्षेत्राकडे राजकीय पक्ष जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची गंभीर टीका केली, तसेच गेली २५ वर्षे आर्थिक विकासाच्या ‘शिड्या’ चढणारा भारत आरोग्यसेवा क्षेत्रात मात्र, ‘सापा’च्या भूमिकेत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (प्रतिनिधी)१८ वर्षांचा असताना कर्करोगाची लागण अमर्त्य सेन यांनी आपल्या देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्राची दयनीय स्थिती सांगताना स्पष्ट केले की, ‘मी १८ वर्षांचा असताना कर्करोगाची लागण झाली होती. त्या वेळीस केवळ ५ वर्षे जगू शकेन, असे डॉक्टरांनी सांगितले होते. १५ टक्के जगण्याची आशाही डॉक्टरांनी व्यक्त केली होती, याला आता ६४ वर्षे उलटली आहेत.’