शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
3
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
4
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
5
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
6
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
7
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
8
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
9
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
10
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
11
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
12
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
13
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
14
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
15
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
16
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
17
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
18
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
19
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
20
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्

उत्तर मुंबई मतदारसंघ : गोपाळांना रोखण्यास गोंविदाचा शोध, भाजपासाठी अनुकूल मतदारसंघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:05 IST

भाजपाचे दिग्गज नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने सिनेअभिनेता गोविंदाला निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून निवडून आलेल्या राम नाईकांचा विजयरथ गोविंदामुळे रोखला गेला. आताही काँग्रेसला अशाच चमत्काराची गरज आहे.

- गौरीशंकर घाळेसाल २००४. चौदाव्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची देशपातळीवर चर्चा झाली. भाजपाचे दिग्गज नेते आणि तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्याविरोधात काँग्रेसने सिनेअभिनेता गोविंदाला निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. सलग पाचवेळा उत्तर मुंबईतून निवडून आलेल्या राम नाईकांचा विजयरथ गोविंदामुळे रोखला गेला. आताही काँग्रेसला अशाच चमत्काराची गरज आहे. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मतदारसंघावरील भाजपाची पकड सुटली नव्हती. २०१४ च्या मोदी लाटेत तर भाजपाने या मतदारसंघावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्या पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तब्बल साडेचार लाखांच्या फरकाने काँग्रेसचे तेव्हाचे खासदार संजय निरुपम यांचा धुव्वा उडविला. त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही उत्तर मुंबईतील सहापैकी चार जागांवर भाजपाचे कमळ फुलले. पुढे महापालिका निवडणुकीतही भाजपाचे २४ नगरसेवक या भागातून विजयी झाले. महापालिकेतील भाजपाच्या ८२ पैकी २४ नगरसेवक एकट्या उत्तर मुंबईतील आहेत. ही आकडेवारी या मतदारसंघावरील भाजपाची पकड सांगण्यास पुरेशीआहे.आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाकडून गोपाळ शेट्टी यांची उमेदवारी जवळपास नक्की आहे. मध्यंतरी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि चारकोपचे आमदार योगेश सागर यांची नावे पुढे आली. पण, ती चर्चेपुरतीच. १९९२ साली नगरसेवक, पुढे मुंबईचे उपमहापौर, दोनवेळा आमदारकी आणि २०१४ साली खासदार असा प्रदीर्घ राजकीय प्रवास असलेले गोपाळ शेट्टी पुन्हा एकदा खासदारकीसाठी शड्डू ठोकून उभे आहेत. युती आणि आघाडीचे काहीही झाले तरी खासदार मीच असेन, असा शेट्टींचा दावा आहे.एकीकडे शेट्टी आणिं त्यांची भाजपा पूर्ण तयारीत असताना काँग्रेसकडे मात्र उमेदवाराची वानवा आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. शेजारच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. पण भक्कम पक्षबांधणी केल्याने निरुपम यांनी उत्तर मुंबईतूनच निवडणूक लढवावी, अशी भूमिका मुंबई काँग्रेसमधील इतर नेत्यांनी घेतली आहे. मुंबई अध्यक्ष म्हणून आपण सर्वत्र पक्ष मजबूत केला, हा निरुपम यांचा दावाच त्यांच्या वाटेतील अडथळा ठरत आहे. ‘पक्ष मजबूत केला, तर मग मतदारसंघातून पळ का काढताय? उत्तर मुंबईतून तुम्ही २००९ साली खासदार झाला होतात, अध्यक्षांनीच मतदारसंघ बदलला तर कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल’ या पक्षांतर्गत विरोधकांच्या या युक्तिवादापुढे निरुपम सध्या निरुत्तर आहेत.काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या बैठकीतही संजय निरुपम यांना मनाजोगता कौल मिळाला नाही. त्यामुळे निरुपम ‘हायकमांड’च्या भरवशावर आहेत. निरुपम नाही, तर मग कोण, या प्रश्नाचेही काँग्रेसकडे उत्तर नाही. त्यामुळे गोविंदाचा भाचा असलेला कॉमेडियन कृष्णा अभिषेकपासून अभिनेत्री नगमा, माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझहरुद्दिन वगैरे सेलिब्रेटींची नावे पुढे योत आहेत. एकूणच २००४ च्या गोविंदा चमत्काराप्रमाणे येत्या निवडणुकीतही काहीतरी चमत्कार घडेल, या आशेवर काँग्रेस कार्यकर्ते आहेत. तीन राज्यांतील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्ते काहीसे आशावादी दिसत असले तरी प्रबळ उमेदवारच नसल्याने उत्तर मुंबईत सध्या तरी ‘सब भूमी गोपाल की’ अशीच अवस्था आहे.सध्याची परिस्थितीयुती फिसकटल्यास शिवसेनेकडून विनोद घोसाळकर यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यादृष्टीने काम सुरू झाल्याचे चित्र नाही.२०१४ साली प्रकाश सुर्वे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि आमदार बनले. त्यांच्या निमित्ताने जुने विरुद्ध नवे शिवसैनिक असा सुप्त संघर्ष या विभागात दिसत आहे.बोरीवली, मालाड रेल्वे स्थानकांतील सोयीसुविधा या शेट्टी यांच्यासाठी जमेच्या बाजू. हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्याच्या मतदारांच्या मागणीवरही काम सुरू.मतदारसंघ बदलासाठी संजय निरुपम यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे सध्या उमेदवार नसल्याची काँग्रेसची अवस्था आहे. परिणामी चांगली लढत देऊ शकेल, शकेल, अशा सेलिब्रिटींची नावे पक्षातील विविध गट पुढे करीत आहेत.२०१४ मध्ये मिळालेली मते6,64,004गोपाळ शेट्टी(भाजपा)2,17,422संजय निरुपम(काँग्रेस)32,364सतीश जैन(आप)8,758नोटा5,506कमलेश यादव(सपा)

टॅग्स :PoliticsराजकारणMumbaiमुंबई