शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

By admin | Updated: February 4, 2016 01:22 IST

ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

पुणे : ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग असल्याची भावना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह व भारत अस्मिता फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल कराड, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.रिजिजू म्हणाले, ‘‘राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात. राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकशाहीमुळे आपले स्वातंत्र्य आणि आवाज अबाधित असल्यानेच आपल्या देशात सहिष्णुतेचे वातावरण आहे. आवाज आणि स्वातंत्र्य दाबले गेले, तर कालांतराने त्याचा स्फोट होतो आणि अरब देशांप्रमाणे हिंसाचार वाढतो. अनेकदा आपल्या ताकदीला आपणच ओळखत नाही, आपल्या देशाची महानता आपण ओळखायला हवी. जाती-धर्मावरुन होणारे भेद दूर व्हायला हवेत. देशाच्या विकासासाठी तो एकमेव मार्ग आहे.’’ पुरस्कारार्थी डॉ. आशिष नंदा आणि मिलिंद कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करताना देशातील युवकांकडून येत्या काळात अनेक अपेक्षा असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासाच्यादृष्टीने केला पाहीजे असे सांगितले. (प्रतिनिधी)