शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

By admin | Updated: February 4, 2016 01:22 IST

ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

पुणे : ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग असल्याची भावना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह व भारत अस्मिता फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल कराड, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.रिजिजू म्हणाले, ‘‘राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात. राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकशाहीमुळे आपले स्वातंत्र्य आणि आवाज अबाधित असल्यानेच आपल्या देशात सहिष्णुतेचे वातावरण आहे. आवाज आणि स्वातंत्र्य दाबले गेले, तर कालांतराने त्याचा स्फोट होतो आणि अरब देशांप्रमाणे हिंसाचार वाढतो. अनेकदा आपल्या ताकदीला आपणच ओळखत नाही, आपल्या देशाची महानता आपण ओळखायला हवी. जाती-धर्मावरुन होणारे भेद दूर व्हायला हवेत. देशाच्या विकासासाठी तो एकमेव मार्ग आहे.’’ पुरस्कारार्थी डॉ. आशिष नंदा आणि मिलिंद कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करताना देशातील युवकांकडून येत्या काळात अनेक अपेक्षा असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासाच्यादृष्टीने केला पाहीजे असे सांगितले. (प्रतिनिधी)