शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

By admin | Updated: February 4, 2016 01:22 IST

ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग

पुणे : ईशान्य भारतात लोकवस्ती कमी असल्याने संसदेत या भागातील प्रतिनिधी तुलनेने कमी आहेत. परंतु, ईशान्येकडील आठही राज्ये भारताचे महत्वाचे अंग असून, ईशान्य भारत हा देशाचा मुख्य भाग असल्याची भावना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह व भारत अस्मिता फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल कराड, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित होते.रिजिजू म्हणाले, ‘‘राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात. राजकारण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकशाहीमुळे आपले स्वातंत्र्य आणि आवाज अबाधित असल्यानेच आपल्या देशात सहिष्णुतेचे वातावरण आहे. आवाज आणि स्वातंत्र्य दाबले गेले, तर कालांतराने त्याचा स्फोट होतो आणि अरब देशांप्रमाणे हिंसाचार वाढतो. अनेकदा आपल्या ताकदीला आपणच ओळखत नाही, आपल्या देशाची महानता आपण ओळखायला हवी. जाती-धर्मावरुन होणारे भेद दूर व्हायला हवेत. देशाच्या विकासासाठी तो एकमेव मार्ग आहे.’’ पुरस्कारार्थी डॉ. आशिष नंदा आणि मिलिंद कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करताना देशातील युवकांकडून येत्या काळात अनेक अपेक्षा असून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासाच्यादृष्टीने केला पाहीजे असे सांगितले. (प्रतिनिधी)