शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

शाहीस्नानासाठी पाणी सोडणे गैर!

By admin | Updated: September 15, 2015 05:20 IST

ज्या गोदावरीच्या पाण्यावर मराठवाड्याची तहान भागते त्याच गोदेचे पाणी कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी सोडल्याने सरकार टीकेचे धनी बनलेले असताना, याच विषयावरून

मुंबई : ज्या गोदावरीच्या पाण्यावर मराठवाड्याची तहान भागते त्याच गोदेचे पाणी कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी सोडल्याने सरकार टीकेचे धनी बनलेले असताना, याच विषयावरून हायकोर्टानेही कान उपटले आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेणेच बेकायदा आहे, असे खडे बोलही हायकोर्टाने सरकारला सुनावले. १८ तारखेच्या शाहीस्नानासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याच्या निर्णयावर राज्य शासनाने पुनर्विचार करावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले. यासंदर्भात प्रा. डॉ. एच. एम. देसरडा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली. त्यावर न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एल़ अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने शासनाचे चांगलेच कान उपटले़ पाणीवाटपाच्या सूत्रानुसार पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी असा प्राधान्यक्रम हवा. शाहीस्नानासाठी त्यानंतर पाणी देता येऊ शकते. सध्या राज्यात दुष्काळजन्य स्थिती आहे़ अशावेळी शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेणेच बेकायदा आहे़ त्यामुळे २५ तारखेच्या शाहीस्नानाला पाणी सोडणार की नाही किंवा किती पाणी सोडणार, याची माहिती २१ सप्टेंबरला न्यायालयाला द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.पाण्यासाठी कोर्टात दावे-प्रतिदावेमहाराष्ट्रात दुष्काळ असताना शाहीस्नानासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अयोग्य आहे. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या शाहीस्नानासाठी सरकारने गंगापूर धरणातून २ टीएमसी पाणी सोडल्याचेही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच धार्मिक कारण देऊन निसर्गस्रोताचा वापर करणे अव्यवहार्य आहे. तेव्हा पाणी सोडण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द करावा, असा युक्तिवाद देसरडा यांनी केला.मात्र १८ सप्टेंबरच्या शाहीस्नानासाठी संपूर्ण तयारी झाली आहे़ १२ वर्षांतून एकदाच ही पर्वणी येते़ त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करावा लागतो़ तेव्हा या तारखेला पाणी सोडण्याच्या निर्णयात बदल करता येणार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला़ मात्र १८ सप्टेंबरच्या शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत सरकारने पुनर्विचार करावा, अशी सूचनाही कोर्टाने केली.