शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

शाहीस्नानासाठी पाणी सोडणे गैर!

By admin | Updated: September 15, 2015 05:20 IST

ज्या गोदावरीच्या पाण्यावर मराठवाड्याची तहान भागते त्याच गोदेचे पाणी कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी सोडल्याने सरकार टीकेचे धनी बनलेले असताना, याच विषयावरून

मुंबई : ज्या गोदावरीच्या पाण्यावर मराठवाड्याची तहान भागते त्याच गोदेचे पाणी कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी सोडल्याने सरकार टीकेचे धनी बनलेले असताना, याच विषयावरून हायकोर्टानेही कान उपटले आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेणेच बेकायदा आहे, असे खडे बोलही हायकोर्टाने सरकारला सुनावले. १८ तारखेच्या शाहीस्नानासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याच्या निर्णयावर राज्य शासनाने पुनर्विचार करावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले. यासंदर्भात प्रा. डॉ. एच. एम. देसरडा यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली. त्यावर न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एल़ अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने शासनाचे चांगलेच कान उपटले़ पाणीवाटपाच्या सूत्रानुसार पिण्यासाठी, शेतीसाठी आणि उद्योगांसाठी असा प्राधान्यक्रम हवा. शाहीस्नानासाठी त्यानंतर पाणी देता येऊ शकते. सध्या राज्यात दुष्काळजन्य स्थिती आहे़ अशावेळी शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेणेच बेकायदा आहे़ त्यामुळे २५ तारखेच्या शाहीस्नानाला पाणी सोडणार की नाही किंवा किती पाणी सोडणार, याची माहिती २१ सप्टेंबरला न्यायालयाला द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.पाण्यासाठी कोर्टात दावे-प्रतिदावेमहाराष्ट्रात दुष्काळ असताना शाहीस्नानासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अयोग्य आहे. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या शाहीस्नानासाठी सरकारने गंगापूर धरणातून २ टीएमसी पाणी सोडल्याचेही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच धार्मिक कारण देऊन निसर्गस्रोताचा वापर करणे अव्यवहार्य आहे. तेव्हा पाणी सोडण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द करावा, असा युक्तिवाद देसरडा यांनी केला.मात्र १८ सप्टेंबरच्या शाहीस्नानासाठी संपूर्ण तयारी झाली आहे़ १२ वर्षांतून एकदाच ही पर्वणी येते़ त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करावा लागतो़ तेव्हा या तारखेला पाणी सोडण्याच्या निर्णयात बदल करता येणार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला़ मात्र १८ सप्टेंबरच्या शाहीस्नानासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत सरकारने पुनर्विचार करावा, अशी सूचनाही कोर्टाने केली.