शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

... हे तर नेमचेंजर सरकार!

By admin | Updated: June 9, 2016 05:45 IST

फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली.

मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून त्यास महात्मा फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली. सरकार ‘गेमचेंजर’ नसून ‘नेमचेंजर’ असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली. शासकीय योजनांना महात्मा फुले यांचे नाव दिलेच पाहिजे. त्यांच्या नावाला कोणीही आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही, परंतु अगोदरपासून इतर एखाद्या नेत्याच्या नावाने सुरू असलेल्या योजनेला दुसऱ्या महापुरूषाचे नाव देणे अयोग्य आहे. भाजप सरकारला राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलायचे होतेच. त्यांनी महात्मा फुले यांचे नाव आणून विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुलेंचे नाव देता येईल, अशी एखादी चांगली योजना सुरू करायला सरकारला काय अडचण आहे? या आधी इंदिरा आवास योजनेचे नाव बदलण्यात आले. जीवनदायी योजनेला राजीव गांधी यांचेच नाव कायम ठेवावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)>कामत यांच्याशी संपर्क नाही>काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले की, आम्ही सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार गुरूदास कामत दिल्लीला गेले असून, त्यांची श्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच यासंदर्भात अधिक प्रतिक्रि या देता येईल.>वसंतदादांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणारमाजी मुख्यमंत्री व थोर नेते वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. हे वर्ष संपूर्ण राज्यात साजरे करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने घेतल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या वर्षामध्ये मुंबई व सांगली येथे दोन मोठे कार्यक्र म तर राज्यातील सर्व जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्र म होतील. प्रदेश काँग्रेसने त्यासाठी आयोजन समिती स्थापन केली असून स्वत: चव्हाण अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कार्याध्यक्ष तर यशवंत हाप्पे हे समन्वयक आहेत.