शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

... हे तर नेमचेंजर सरकार!

By admin | Updated: June 9, 2016 05:45 IST

फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली.

मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून त्यास महात्मा फुले यांचे नाव देण्याचा सरकारचा निर्णय हा अकारण वाद निर्माण करणारा असून हे तर खालच्या पातळीवरील राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आज केली. सरकार ‘गेमचेंजर’ नसून ‘नेमचेंजर’ असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली. शासकीय योजनांना महात्मा फुले यांचे नाव दिलेच पाहिजे. त्यांच्या नावाला कोणीही आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही, परंतु अगोदरपासून इतर एखाद्या नेत्याच्या नावाने सुरू असलेल्या योजनेला दुसऱ्या महापुरूषाचे नाव देणे अयोग्य आहे. भाजप सरकारला राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलायचे होतेच. त्यांनी महात्मा फुले यांचे नाव आणून विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुलेंचे नाव देता येईल, अशी एखादी चांगली योजना सुरू करायला सरकारला काय अडचण आहे? या आधी इंदिरा आवास योजनेचे नाव बदलण्यात आले. जीवनदायी योजनेला राजीव गांधी यांचेच नाव कायम ठेवावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)>कामत यांच्याशी संपर्क नाही>काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. चव्हाण म्हणाले की, आम्ही सातत्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार गुरूदास कामत दिल्लीला गेले असून, त्यांची श्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच यासंदर्भात अधिक प्रतिक्रि या देता येईल.>वसंतदादांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणारमाजी मुख्यमंत्री व थोर नेते वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. हे वर्ष संपूर्ण राज्यात साजरे करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने घेतल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. या वर्षामध्ये मुंबई व सांगली येथे दोन मोठे कार्यक्र म तर राज्यातील सर्व जिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्र म होतील. प्रदेश काँग्रेसने त्यासाठी आयोजन समिती स्थापन केली असून स्वत: चव्हाण अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कार्याध्यक्ष तर यशवंत हाप्पे हे समन्वयक आहेत.