शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनाला फटका नाही - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: January 28, 2017 21:51 IST

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. २८ - गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पणजीत सभा घेत प्रचाराला प्रारंभ केला. दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदींवर टीका होत असतानाच त्यांनी हाच मुद्दा उचलून धरत नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. 'गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास गोवा देशातील सर्वोत्तम राज्य होईल' असे सांगत गोव्याला स्थिर सरकार द्या असे मोदी म्हणाले. गोवा विधानसभेसाठी येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते
गोव्याने देशाला पर्रिकरांच्या रुपात संरक्षणमंत्री दिला आहे, सर्जिकल स्ट्राइकची चर्चा संपूर्ण देशात आहे असे सांगत मोदींनी मनोहर पर्रीकरांची स्तुती केली. तसेच विरोधकांवर टीकास्त्र सोडतानाच 'ज्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, ते निवडणुकीच्या रणांगणात का उतरले?' असा सवालही त्यांनी विचारला.
 
 केंद्रातील सरकार धाडसी असून ते धाडसी निर्णय घेत आहे. यापुढेही देशहितासाठी आम्ही धाडसी निर्णय घेत राहू. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचारीच घाबरले; कारण सत्तर वर्षे त्यांनी जे काही लुटले ते केंद्र सरकार परत घेत आहे, असेही ते म्हणाले.  कर्नाटकमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरी छापा पडला तेव्हा दीडशे कोटी रुपये रोख, नव्या नोटांच्या रूपात सापडले. तरी देखील त्या मंत्र्याविरुद्ध कर्नाटक सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. साधी नोटीसही त्याला पाठवली नाही. गोव्यात अशा प्रकारचे भ्रष्टाचारी जर लोकांना नको असतील तर लोकांनी भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत द्यावे. आपण येत्या पाच वर्षांत गोवा पूर्ण बदलून दाखवतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. ते म्हणाले, नोटाबंदीचा लाभ देशातील गरिबांना होईल. सामान्य लोकांना होईल. आता यापुढे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तथापि, अर्थसंकल्प जाहीर होण्याअगोदरच काही विरोधक व काही कथित अर्थतज्ज्ञ अर्थसंकल्प कसा अपयशी आहे, बेकार आहे ते दाखवून देण्यासाठी प्रतिक्रिया व भाषणांचा मसुदा तयार करू लागलेत. त्यांची पूर्वतयारी अगोदरच सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाने विरोधात बोलले की मग गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आदी राज्यांमध्ये केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध चुकीचा संदेश जाईल, असे विरोधकांना वाटते.
गोव्याला राजकीय अस्थिरतेचा शाप आहे. अस्थिरतेमुळे यापूर्वीच्या काळात गोवा राज्य मागे राहिले. मात्र, आता गोव्याचा विकास एवढ्या चांगल्या प्रकारे होत आहे, की देशातील मोठ्या राज्यांना देखील त्यातून धडा शिकायला मिळत आहे, असे मोदी म्हणाले. या वेळी पर्रीकर व पार्सेकर यांचीही भाषणे झाली.