शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनाला फटका नाही - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: January 28, 2017 21:51 IST

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. २८ - गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पणजीत सभा घेत प्रचाराला प्रारंभ केला. दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदींवर टीका होत असतानाच त्यांनी हाच मुद्दा उचलून धरत नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. 'गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास गोवा देशातील सर्वोत्तम राज्य होईल' असे सांगत गोव्याला स्थिर सरकार द्या असे मोदी म्हणाले. गोवा विधानसभेसाठी येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते
गोव्याने देशाला पर्रिकरांच्या रुपात संरक्षणमंत्री दिला आहे, सर्जिकल स्ट्राइकची चर्चा संपूर्ण देशात आहे असे सांगत मोदींनी मनोहर पर्रीकरांची स्तुती केली. तसेच विरोधकांवर टीकास्त्र सोडतानाच 'ज्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, ते निवडणुकीच्या रणांगणात का उतरले?' असा सवालही त्यांनी विचारला.
 
 केंद्रातील सरकार धाडसी असून ते धाडसी निर्णय घेत आहे. यापुढेही देशहितासाठी आम्ही धाडसी निर्णय घेत राहू. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचारीच घाबरले; कारण सत्तर वर्षे त्यांनी जे काही लुटले ते केंद्र सरकार परत घेत आहे, असेही ते म्हणाले.  कर्नाटकमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरी छापा पडला तेव्हा दीडशे कोटी रुपये रोख, नव्या नोटांच्या रूपात सापडले. तरी देखील त्या मंत्र्याविरुद्ध कर्नाटक सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. साधी नोटीसही त्याला पाठवली नाही. गोव्यात अशा प्रकारचे भ्रष्टाचारी जर लोकांना नको असतील तर लोकांनी भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत द्यावे. आपण येत्या पाच वर्षांत गोवा पूर्ण बदलून दाखवतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. ते म्हणाले, नोटाबंदीचा लाभ देशातील गरिबांना होईल. सामान्य लोकांना होईल. आता यापुढे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तथापि, अर्थसंकल्प जाहीर होण्याअगोदरच काही विरोधक व काही कथित अर्थतज्ज्ञ अर्थसंकल्प कसा अपयशी आहे, बेकार आहे ते दाखवून देण्यासाठी प्रतिक्रिया व भाषणांचा मसुदा तयार करू लागलेत. त्यांची पूर्वतयारी अगोदरच सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाने विरोधात बोलले की मग गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आदी राज्यांमध्ये केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध चुकीचा संदेश जाईल, असे विरोधकांना वाटते.
गोव्याला राजकीय अस्थिरतेचा शाप आहे. अस्थिरतेमुळे यापूर्वीच्या काळात गोवा राज्य मागे राहिले. मात्र, आता गोव्याचा विकास एवढ्या चांगल्या प्रकारे होत आहे, की देशातील मोठ्या राज्यांना देखील त्यातून धडा शिकायला मिळत आहे, असे मोदी म्हणाले. या वेळी पर्रीकर व पार्सेकर यांचीही भाषणे झाली.