शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनाला फटका नाही - पंतप्रधान मोदी

By admin | Updated: January 28, 2017 21:51 IST

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. २८ - गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पणजीत सभा घेत प्रचाराला प्रारंभ केला. दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदींवर टीका होत असतानाच त्यांनी हाच मुद्दा उचलून धरत नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. 'गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्यास गोवा देशातील सर्वोत्तम राज्य होईल' असे सांगत गोव्याला स्थिर सरकार द्या असे मोदी म्हणाले. गोवा विधानसभेसाठी येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते
गोव्याने देशाला पर्रिकरांच्या रुपात संरक्षणमंत्री दिला आहे, सर्जिकल स्ट्राइकची चर्चा संपूर्ण देशात आहे असे सांगत मोदींनी मनोहर पर्रीकरांची स्तुती केली. तसेच विरोधकांवर टीकास्त्र सोडतानाच 'ज्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, ते निवडणुकीच्या रणांगणात का उतरले?' असा सवालही त्यांनी विचारला.
 
 केंद्रातील सरकार धाडसी असून ते धाडसी निर्णय घेत आहे. यापुढेही देशहितासाठी आम्ही धाडसी निर्णय घेत राहू. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचारीच घाबरले; कारण सत्तर वर्षे त्यांनी जे काही लुटले ते केंद्र सरकार परत घेत आहे, असेही ते म्हणाले.  कर्नाटकमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरी छापा पडला तेव्हा दीडशे कोटी रुपये रोख, नव्या नोटांच्या रूपात सापडले. तरी देखील त्या मंत्र्याविरुद्ध कर्नाटक सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. साधी नोटीसही त्याला पाठवली नाही. गोव्यात अशा प्रकारचे भ्रष्टाचारी जर लोकांना नको असतील तर लोकांनी भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत द्यावे. आपण येत्या पाच वर्षांत गोवा पूर्ण बदलून दाखवतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. ते म्हणाले, नोटाबंदीचा लाभ देशातील गरिबांना होईल. सामान्य लोकांना होईल. आता यापुढे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. तथापि, अर्थसंकल्प जाहीर होण्याअगोदरच काही विरोधक व काही कथित अर्थतज्ज्ञ अर्थसंकल्प कसा अपयशी आहे, बेकार आहे ते दाखवून देण्यासाठी प्रतिक्रिया व भाषणांचा मसुदा तयार करू लागलेत. त्यांची पूर्वतयारी अगोदरच सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाने विरोधात बोलले की मग गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आदी राज्यांमध्ये केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध चुकीचा संदेश जाईल, असे विरोधकांना वाटते.
गोव्याला राजकीय अस्थिरतेचा शाप आहे. अस्थिरतेमुळे यापूर्वीच्या काळात गोवा राज्य मागे राहिले. मात्र, आता गोव्याचा विकास एवढ्या चांगल्या प्रकारे होत आहे, की देशातील मोठ्या राज्यांना देखील त्यातून धडा शिकायला मिळत आहे, असे मोदी म्हणाले. या वेळी पर्रीकर व पार्सेकर यांचीही भाषणे झाली.