शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

नोटाबंदीचा देशावर परिणाम वाईट - शरद पवार

By admin | Updated: December 30, 2016 22:14 IST

चलन तुटवड्याचा वाईट परिणाम व्यवसाय, उद्योग, रोजगार, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांवर झाला आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 30 - नोटाबंदी झाली खरी; परंतु चलन तुटवड्याचा वाईट परिणाम व्यवसाय, उद्योग, रोजगार, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांवर झाला आहे. यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून, याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.वरवडे (ता. माढा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व नूतन इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील होते. प्रारंभी वरवडेतील विविध विकासकामांचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी सरपंच शोभा घाडगे, उपसरपंच नागनाथ पाटील, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक प्रताप घाडगे, भारत गायकवाड, संजीव पाटील, सरोज पाटील, डॉ. गणेश ठाकूर, सीताराम गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नोटाबंदी होऊन पन्नास दिवस झाले तरी अजूनही बँकांसमोरील रांगा कमी होईनात. या रांगांमध्ये एकही धनवान दिसला नसून, सर्व गोरगरीब व सर्वसामान्य जनता दिसत आहे. मी ज्यावेळी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळी जिल्ह्यात भयानक दुष्काळी परिस्थिती होती. पूर्वी वरवडे या गावाचा तालुका मोडनिंब होते. मिरज संस्थानच्या काळात मोडनिंबला तालुक्याचा दर्जा होता. पुन्हा त्याचा माढा तालुका झाला. परंतु शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सतत माझ्यापुढे मांडणारे आ. गणपतराव देशमुख, भाई एस. एम. पाटील आहेत. भाई एस. एम. पाटील यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य गणेश ठाकूर यांनी केले. यावेळी माजी आ. एस. एम. पाटील, ए. डी. पाटील, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांचा निधी संस्थेसाठी खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाला आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, माजी आ. विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, मनोहर डोंगरे, कल्याणराव काळे, माढा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास तोडकरी, जि. प. च्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, उत्तम आवारी, शहाजी डोंगरे, कमलाकर महामुनी, प्राचार्य साहेबराव लेंडवे, अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.