शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धोकादायक इमारतींचे नाही ‘स्ट्रक्चरल आॅडिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 13:00 IST

सोलापूर जिल्हा; ३४६ इमारती अतिधोकादायक, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना नाही

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींमध्ये ३४६ इमारती अतिधोकादायक

सोलापूर : मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींमध्ये ३४६ इमारती अतिधोकादायक अवस्थेत असून त्या कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, बार्शी, करमाळा, कुर्डूवाडी, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी नऊ नगरपालिकातील काही बांधकाम विभागाने पावसाळ््यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे तर काहींनी प्रक्रिया सुरु केली आहे. या धोकादायक इमारतींच्या पाडकामाबद्दल मात्र उदासीनता  दिसून येत आहे.  काही ठिकाणी नोटिसी बजावण्यात आल्या आहेत मात्र  स्वत:हून कोणीही इमारतीचे पाकड काम केलेले नाही. नोटिसी बजावणे, वर्तमापत्रांमध्ये प्रसिद्धीकरण करणे याशिवाय फारशी तसदी घेतली नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. स्ट्रक्चरल आॅडिटचा तर पत्ता नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

मंगळवेढ्यात १०५ घरे व इमारती धोकादायकमंगळवेढा पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक घरांचा १० जून रोजी सर्व्हे केला आहे़ त्यामध्ये मोडकळीस आलेल्या १०५ घरे व इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत़ गतवर्षी ६८ जणांना नोटिसा बजावून स्थलांतराच्या सूचना केल्या आहेत; मात्र आजही ते पर्यायी व्यवस्था नसल्याने याच धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत.

१३६ बांधकामांना परवानगीपंढरपुरात वर्षभरात १३६ बांधकामाला परवानगी मिळाली़ बांधकाम परवाना मागणीसाठी आलेले नागरीकच इतर इंजिनिअरकडून इमारतींचे भूकंपरोधक दाखला घेऊन येतात. शहरात २३ ठिकाणच्या इमारतीसाठी जागा मालक आणि भाडेकरूंचा वाद सुरू आहे. धोकादायक इमारतींमुळे शहरात दुर्घटना झाली नाही.

प्रशासनाकडून ठोस उपाययोजना नाहीजिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि तीन नगर पंचायतीमध्ये असलेल्या जुन्या इमारतींच्या बाबतीत स्ट्रक्चरल आॅडिटच झाले नसल्याचे समोर आले आहे.  काही ठिकाणी सर्व्हेक्षण झाले असले तरी याबद्दल ठोस अशी कारवाई करण्यात आलेली नाही.  या धोकादायक इमारतींच्या बाबतीत गांभीर्याने दखल न घेतल्यास दुर्घटना घडू शकते.

टॅग्स :Solapurसोलापूर