शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

महावितरणमध्ये मराठा कोट्यातून आरक्षण नाही; एसईबीसी आरक्षण प्रकरणी कोर्टाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 06:40 IST

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारने तात्पुरता उपाय म्हणून  ३१ मे २०२१ रोजी अधिसूचना काढत एसईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना  ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेण्याची परवानगी दिली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणमध्ये नोकरीसाठी मराठा कोट्यातून (एसईबीसी)  अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही. निवड प्रक्रियेच्या मध्येच प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी व अन्यायकारी आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने या प्रकरणी सरकारी अधिसूचना पूर्वलक्षित प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

राज्य सरकारची ३१ मे २०२१ची अधिसूचना पूर्वलक्षित प्रभावाने लागू करून मराठा कोट्यातील पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून नोकरीचा लाभ देण्याचा महावितरणचा निर्णय मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने शुक्रवारी रद्द केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, महावितरणने ऑगस्ट, २०१९मध्ये नोकर भरतीसाठी अर्ज मागविण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात ईडब्ल्यूएस व एसईबीसीसाठी स्वतंत्र आरक्षण असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच मराठा आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही नमूद करण्यात आले होते. त्यामुळे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची निवड ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल, याचाही जाहिरातीत उल्लेख होता. 

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या वैधतेचा मुद्दा प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारने तात्पुरता उपाय म्हणून  ३१ मे २०२१ रोजी अधिसूचना काढत एसईबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना  ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ घेण्याची परवानगी दिली. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण रद्द केले. मात्र, महावितरण कंपनीने राज्य सरकारच्या अधिसूचनेचा अन्वयार्थ असा लावला की, एसईबीसी प्रवर्गातील जे पात्र उमेदवार आहेत, त्यांना एसईडब्ल्यू प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी विचारात घेतले जाऊ शकते. सरकारच्या अधिसूचनेच्या आधारावर महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय बेकायदेशीर व कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे, असे खंडपीठाने म्हटले. 

‘निवड प्रक्रियेच्या मध्येच प्रवर्ग बदलण्याची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी व अन्यायकारी आहे. निवड प्रक्रियेसाठी पूर्वलक्षित प्रभावाने अधिसूचना जारी करण्याची प्रतिवादींची (राज्य सरकार, महावितरण) बेकायदेशीर आणि कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आहे’, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण