शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

वाकडय़ा नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही

By admin | Updated: August 17, 2014 02:50 IST

आयएनएस कोलकाता या संपूर्णपणो स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे भारताचे बौद्धिक सामथ्र्य आणि उत्पादन क्षमतेची झलक जगाला दिसेल.

 मुंबई : आयएनएस कोलकाता या संपूर्णपणो स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे भारताचे बौद्धिक सामथ्र्य आणि उत्पादन क्षमतेची झलक जगाला दिसेल. भविष्यात भारताकडे कोणीही वाकडी नजर करण्याची हिंमत करणार नाही, असे संरक्षण सामथ्र्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. 

माझगाव डॉक येथे नौदलासाठी बांधलेल्या ‘आयएनएस कोलकाता’ या स्वदेशी बनावटीच्या सर्वात मोठय़ा युद्धनौकेचे राष्ट्रार्पण  करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्याला संरक्षणमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल,  नौदलप्रमुख अॅडमिरल आर.के. धवन, राज्यपाल  के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार अरविंद सावंत, पूनम महाजन आदी  उपस्थित होते. ‘आयएनएस कोलकाता’च्या  कप्तानपदी तरुण सोबती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात देश संरक्षणसामग्री आणि शस्त्रस्त्र उत्पादनात स्वयंभू, स्वयंपूर्ण होईल. त्यासाठी जगातील सर्वोत्तम उत्पादकांना आमंत्रण देण्यात येईल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. 
पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईतल्या पहिल्याच जाहीर भाषणात मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण केले. संरक्षण व व्यापार क्षेत्रत नौदलाचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
सप्टेंबर, 2क्क्3पासून माझगाव डॉक लिमिटेडकडून बांधणीला सुरुवात करण्यात आलेल्या आयएनएस कोलकाता या युद्धनौकेचे आज मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. 
 
आयएनएस कोलकाता ही युद्धनौका स्वदेशी बनावटीचे आजवरचे सर्वात मोठे संरक्षण उत्पादन आहे. सद्य:स्थितीत जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून सागरी सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. त्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. सागरी संरक्षणाच्या दृष्टीने ही नौका भारतीय नौदलाचे बळ वाढवेल, असे मोदी म्हणाले.
 
पनवेल/उरण : निर्यात क्षेत्र हे केवळ केंद्र शासनाशी निगडित असल्याने राज्यांचा सहभाग त्यात फारसा नसतो. त्यामुळे देशात निर्यात कमी आणि आयात अधिक आहे. आगामी काळात या क्षेत्रत राज्यांना जोडण्यासाठी बंदरांच्या विकासाबरोबरच सागरमाला योजना राबविण्यात येणार आहे. बंदरांबरोबरच एसईङोड, रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग, समुद्री मार्ग यांचीही जोडणी आवश्यक आहे. देशातील उत्पन्नाची निर्यात वाढविण्यासाठी सागरमाला प्रकल्प राबवून सर्व बंदरांची श्रंखला तयार करण्याचा मनोदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. 
 
महाराष्ट्राला मिळणार 4क्क् कोटींची वीज मोफत 
सोलापूर : गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़ यामुळे येथे जलविद्युत प्रकल्प होण्यास गती मिळाली असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 4क्क् कोटींची वीज मोफत मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल़े -