शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ना इंजिनीअर, ना एस्टिमेट, आदिवासींनीच बांधला ६० मीटर लांबीचा नाल्यावर पूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 07:11 IST

भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे.

श्यामराव येरकलवारलाहेरी (जि. गडचिरोली) : पावसाळ्यात उर्वरित जगाशी संपर्क बंद पाडणाऱ्या नाल्यावर पूल बांधून द्यावा, यासाठी सरकारदरबारी अर्ज-विनंत्या केल्या. सरकार पूल बांधून देत नाही म्हणून किती दिवस अडचणी झेलत राहायचे? अखेर आपली समस्या आपणच सोडवायची, असा निर्धार करत त्यांनी त्या खळखळ वाहणाऱ्या नाल्यावर लाकडी पाट्यांचा मजबूत पूल तयार करून घेतला. ना कुणी अभियंता, ना एस्टिमेट. आदिवासीच अभियंता झाले आणि आपल्या कल्पकतेतून त्यांनी पूल साकारला.

भामरागडच्या दुर्गम भागात लोक रस्ते, पुलांअभावी विविध समस्यांना तोंड देत असतात. आदिवासीबहूल दुर्गम क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात घनदाट जंगल आहे. या भागात पाऊसही जास्त पडतो. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरदऱ्यातून ओसंडून वाहणाऱ्या नदी, नाल्यांमुळे पैलतीरावरील गावांचा संपर्क तुटतो. गुंडेनूर नाल्यावर पूल नसल्यामुळे या गावातील नागरिक मागील ६ वर्षांपासून पावसाळ्यात बांबूपासून ताटवे बनवून पूल तयार करायचे. पाण्याचा प्रवाह चांगला असेपर्यंत ते टिकून राहात. त्यामुळे यावर्षी नवीन प्रयोग करत बांबूऐवजी लाकडी पाट्यांचा पूल गावकऱ्यांनी बनविला. जवळपास ६० मीटर लांबीचा हा पूल बांबूच्या पुलापेक्षा मजबूत आहे.

दरवर्षीची कसरत, पक्का पूल हवागुंडेनूर नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदी पार करणे अशक्य होऊन एका गर्भवतीला प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे शासनाने पूल बनवून द्यावा म्हणून रडगाणे गात बसण्याऐवजी श्रमदान करून स्वत:च आपली समस्या दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, नागरिकांनी शोधलेला हा उपाय कायमस्वरुपी नाही. दरवर्षी त्यांना ही कसरत करावी लागते. नाल्यावर पक्का पूल तयार करून दिल्यास बिनागुंडा परिसरातील अनेक गावांचा भामरागडशी बारमाही संपर्क राहील.