शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

तटकरेंची ‘ती’ मँनेजमेंट या वेळी दिसलीच नाही!

By admin | Updated: May 17, 2014 00:46 IST

रोहा तालुक्यापुरते सांगायचे झाले तर कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, ही पहिली निवडणूक आहे, जिथे तटकरेंनी आमच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्कच ठेवला नव्हता

रोहा : णारे तटकरे यांनाच केंद्रात जायचे नव्हते, असे त्यांनी या वेळी निवडणुकीच्या केलेल्या व्यूहरचनेवरुन आणि राबविलेल्यापक्ष जी काही जबाबदारी देईल, ती आपण स्वीकारु, असे सदैव सांग प्रचार यंत्रणेवरुन दिसून आले आहे. प्रत्येक निवडणुकीत तटकरेंची अव्वल दर्जाची मॅनेजमेंट असायची. यंदाच्या वेळी तटकरेंची ती मॅनेजमेंट इतरांना सोडाच मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कुठे दिसून आली नसल्यानेच कदाचित हा पराभव ओढवला, असा सूर या वेळी कार्यकर्त्यांमधूनच निघू लागला आहे. निवडणूक काळात कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या सतत संपर्कात राहणे हा सुनील तटकरेंचा हातखंडा होता. तोच या निवडणुकीत कुठे पाहायला मिळाला नाही. रोहा तालुक्यापुरते सांगायचे झाले तर कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, ही पहिली निवडणूक आहे, जिथे तटकरेंनी आमच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्कच ठेवला नव्हता. अन्यथा ते निवडणुकीला उभे राहिले की प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा अथवा त्यांच्या निकटवर्तीयांचा संपर्क झाला नाही, असे आजवर घडले नव्हते. निवडणूक मतदानाच्या एक दोन दिवस आधी ते कार्यकर्त्यांसोबत अधिक सक्रिय झाले. यापूर्वी मतदानाच्या दिवशीही भल्या पहाटेपासून स्वत: किंवा त्यांच्या पी.ए. मार्फत ते संपर्कात राहून विविध सूचना द्यायचे. निवडणूक मतदान झाल्यावर दुसर्‍या दिवशी प्रत्येक बुथची परिस्थिती ते स्वत:हून जाणून घ्यायचे. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना सुतारवाडी येथे ते स्वत: फोन करुन बोलवित, मात्र यंदा तसे काहीही घडलेले नाही. तटकरे निवडणुकीला उभे आहेत की नाही आणि असले तरी मनापासून नसावेत म्हणूनच या निवडणुकीत गोंधळ उडाला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असावे, अशी येथील कार्यकर्त्यांची धारणा बनली आहे. तटकरेंना राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रिपद सोडून केंद्रात जाणे पसंत नव्हते. खासदारकीची उमेदवारी नको, असे पक्षाचे नेते शरद पवार यांना सांगण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते आणि तशी परिस्थितीही नव्हती. आपण निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचा आभास त्यांनी निर्माण केला होता. यासाठीच आजवर कुठल्याही निवडणुकीत कधी नव्हे ते शरद पवारांच्या दोन सभा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी अख्खा मंत्रिमंडळ आणि सुप्रिया सुळेंनाही त्यांनी रायगडमध्ये आपल्या प्रचारासाठी आणले आणि तसा आभास का असेना तो निर्माण करण्यात त्यांना मात्र यशही आले.