शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

तटकरेंची ‘ती’ मँनेजमेंट या वेळी दिसलीच नाही!

By admin | Updated: May 17, 2014 00:46 IST

रोहा तालुक्यापुरते सांगायचे झाले तर कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, ही पहिली निवडणूक आहे, जिथे तटकरेंनी आमच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्कच ठेवला नव्हता

रोहा : णारे तटकरे यांनाच केंद्रात जायचे नव्हते, असे त्यांनी या वेळी निवडणुकीच्या केलेल्या व्यूहरचनेवरुन आणि राबविलेल्यापक्ष जी काही जबाबदारी देईल, ती आपण स्वीकारु, असे सदैव सांग प्रचार यंत्रणेवरुन दिसून आले आहे. प्रत्येक निवडणुकीत तटकरेंची अव्वल दर्जाची मॅनेजमेंट असायची. यंदाच्या वेळी तटकरेंची ती मॅनेजमेंट इतरांना सोडाच मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कुठे दिसून आली नसल्यानेच कदाचित हा पराभव ओढवला, असा सूर या वेळी कार्यकर्त्यांमधूनच निघू लागला आहे. निवडणूक काळात कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांच्या सतत संपर्कात राहणे हा सुनील तटकरेंचा हातखंडा होता. तोच या निवडणुकीत कुठे पाहायला मिळाला नाही. रोहा तालुक्यापुरते सांगायचे झाले तर कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, ही पहिली निवडणूक आहे, जिथे तटकरेंनी आमच्याशी कुठल्याच प्रकारचा संपर्कच ठेवला नव्हता. अन्यथा ते निवडणुकीला उभे राहिले की प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा अथवा त्यांच्या निकटवर्तीयांचा संपर्क झाला नाही, असे आजवर घडले नव्हते. निवडणूक मतदानाच्या एक दोन दिवस आधी ते कार्यकर्त्यांसोबत अधिक सक्रिय झाले. यापूर्वी मतदानाच्या दिवशीही भल्या पहाटेपासून स्वत: किंवा त्यांच्या पी.ए. मार्फत ते संपर्कात राहून विविध सूचना द्यायचे. निवडणूक मतदान झाल्यावर दुसर्‍या दिवशी प्रत्येक बुथची परिस्थिती ते स्वत:हून जाणून घ्यायचे. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना सुतारवाडी येथे ते स्वत: फोन करुन बोलवित, मात्र यंदा तसे काहीही घडलेले नाही. तटकरे निवडणुकीला उभे आहेत की नाही आणि असले तरी मनापासून नसावेत म्हणूनच या निवडणुकीत गोंधळ उडाला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असावे, अशी येथील कार्यकर्त्यांची धारणा बनली आहे. तटकरेंना राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रिपद सोडून केंद्रात जाणे पसंत नव्हते. खासदारकीची उमेदवारी नको, असे पक्षाचे नेते शरद पवार यांना सांगण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते आणि तशी परिस्थितीही नव्हती. आपण निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्टा करीत असल्याचा आभास त्यांनी निर्माण केला होता. यासाठीच आजवर कुठल्याही निवडणुकीत कधी नव्हे ते शरद पवारांच्या दोन सभा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी अख्खा मंत्रिमंडळ आणि सुप्रिया सुळेंनाही त्यांनी रायगडमध्ये आपल्या प्रचारासाठी आणले आणि तसा आभास का असेना तो निर्माण करण्यात त्यांना मात्र यशही आले.