शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...
3
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
4
पैसे तयार ठेवा! ऑनलाईन शॉपिंग कंपनी मीशो IPO आणण्यासाठी सज्ज! किती कोटींचा निधी उभारणार?
5
Smriti Mandhana Soon Marry : ठरलं! टीम इंडियाची 'क्वीन' लवकरच उरकणार लग्न; तिच्या 'राजकुमारानं'च दिली हिंट
6
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
7
Video - कामाचा मोबदला! रशियन महिलेने मेडला दिला महिन्याला ४५ हजार पगार, चर्चेला उधाण
8
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
9
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
10
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
13
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
14
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
15
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
16
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
17
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
18
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
20
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...

निसर्ग चक्रीवादळ आज रायगडला धडकणार; संचारबंदी जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 06:43 IST

आपत्कालीन यंत्रणा सतर्क : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/अलिबाग/पालघर : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत असून बुधवारी दुपारी ते अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. रायगडच्या किनारपट्टी भागातून ४० हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. भारतीय नौसेना, भारतीय तटरक्षक दल व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईसह कोकणात चक्रीवादळ सहसा धडकत नाहीत. २००९ साली फियान चक्रीवादळ मुंबईजवळच्या किनारपट्टीला धडकले होते. हा अपवाद वगळता या आपत्तीचा सामना करण्याची वेळ आता आल्याने खबरदारी म्हणून रायगड आणि पालघर जिल्ह्यांत एनडीआरएफच्या १५, एसडीआरएफच्या पाच तुकड्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून पाच तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अरबी समुद्रातील चक्रीवादळ पणजीपासून २८० किमी, मुंबईपासून ४३० किमी आणि सुरतपासून ६४० किमी अंतरावर होते. ताशी ११ किलोमीटर या वेगाने ते उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढच्या बारा तासांमध्ये याचा वेग आणखी वाढेल. बुधवारी दुपारी किंवा संध्याकाळी ते उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातदरम्याचे हरिहरेश्वर, दमण आणि अलिबाग ओलांडेल. यावेळी येथे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस पडेल.173000नागरिक प्रभावित होण्याची शक्यताअलिबाग : रायगडमधील सात तालुक्यांतील समुद्र तसेच खाडी किनाऱ्यांवरील ६० गावांमधील सुमारे एक लाख ७३ हजार नागरिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यातील तब्बल ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.सिंधुदुर्गात समुद्राच्या लाटांची उंची वाढलीकमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गमध्ये मंगळवार दुपारी साडेबारानंतर समुद्राच्या लाटांची उंची वाढली असून वाºयाने जोर धरण्यास सुरुवात केल्याने किनारपट्टी भागात घबराटीचे वातावरण आहे. रत्नागिरीतही अशीच स्थिती आहे.पालघर किनारपट्टीवर दहशत;ताशी १२० किमी वेगाने वारे वाहणारडहाणू तालुक्यातील किनाºयावरील सतीपाडा, दिवादांडी, मांगेलवाडा, आगर, नरपड, धाकटी डहाणू, तडियाले, गुंगवाडा, घोलवड, बोर्डी आदी भागातील नागरिकांना सुरक्षितता म्हणून प्रशासनाने केएल पोंदा हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल व दोन सभागृहांत हलविले आहे.याच भागाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. किनाºयावर वादळपूर्व स्थिती निर्माण होत असून मंगळवारी दुपारपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरू आहे. मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास प्रशासनाने अगोदरच मनाई केली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ