- जयंत धुळप
अलिबाग, दि. १५ -
भक्तांचेनि साभिमानें। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध ॥
वीस दशक दासबोध। श्रवणद्वारें घेतां शोध। मनकत्र्यास विशद। परमार्थ होतो ॥
वीस दशक दोनीसें समास। साधकें पाहावें सावकास। विवरतां विशेषाविशेष। कळों लागे ॥
ग्रंथाचें करावें स्तवन। स्तवनाचें काये प्रयोजन। येथें प्रत्ययास कारण। प्रत्ययो पाहावा ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
असे वर्णन करत दस्तूरखुद्द समर्थ रामदास स्वामींनीं दासबोधा ग्रंथाचे सन १६५४ मध्ये लेखन पूर्ण केले. माघ नवमी या दिवशी या महाग्रंथाची निर्मिती झाली, त्यास मंगळवार दि. १६ फेब्रुवारी रोजी ३६२ वर्ष पूर्ण होत आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यांत महाडपासून तीस किमी अंतरावर असलेल्या पर्वतराजीतील वाघजई दरीच्या कुशीतील ‘शिवथरघळ’ येथे रामदास स्वामींनी या दासबोधाची रचना साकारली. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, पुढे ही नदी सावित्नी नदीला जाऊन मिळते. काळ नदिच्या काठावरी कुंभे, कसबे आणि आंबे अशी तीन शिवथर गावे येथे आहेत. चहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार वनराईत झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथर घळ आहे. या घळीला समर्थ रामदास स्वामी ’सुंदरमठ’ असे म्हणत असत.
छत्रपती शिवाजी महारांजांनी येथेच घेतले रामदास स्वामींचे आशिर्वाद :
सुसंस्कारीत करणारा दासबोध :
दासबोध हा समर्थ रामदास स्वामींनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींयांनी केले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १९ समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांच्या, साधकांच्या, निस्पृहांच्या, विरक्तांच्या, सर्व सामान्यांच्या, बालकांच्या, प्रौढांच्या,जराजर्जरांच्या अशा सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्नी-पुरु षांच्या मानवी मनाला उपदेश केला आहे. मानवी मनास सुसंस्कारीत करणा:या या ग्रंथाचे पारायण देखील केले जाते.
समर्थभक्त श्री. शंकर कृष्ण देव यांनी शोधून काढली घळ :
दासबोध ग्रंथ पालखी आणि महाप्रसादाने उत्सवाची सांगता :
माघ प्रतिपदेपासून सुरु होणा:या या ‘दासबोध जंयती’ सोहोळ्य़ात पहाटे काकड आरती, रामनाम जप, दासबोध पारायण, दासबोध व अन्य एक ग्रंथ अशी दररोज दोन प्रवचने, सायंकाळी उपासना, रात्री वारकरी भजन मंडळांच्या भजनाची बारी असे धार्मीक कार्यक्रम होतात. माघ नवमीच्या दिवशी सकाळी दासबोध ग्रंथाची शानदार पालखी काळ नदिच्या काठावरी कुंभे, कसबे आणि आंबे या तिनही शिवथर गावांमध्ये फिरुन पुन्हा शिवथर घळीत येते आणि तेथे महाप्रसादाचा लाभ सर्वानी घेतल्यावर ‘दासबोध जंयती’उत्सवाची सांगता होते असेही गांगल यांनी अखेरीस सांगितले.