शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

वीज कोसळून नऊ ठार

By admin | Updated: June 12, 2015 03:54 IST

राज्यात वीज कोसळून गेल्या चोवीस तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये विदर्भातील सात शेतकऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे़

नागपूर/जळगाव : राज्यात वीज कोसळून गेल्या चोवीस तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये विदर्भातील सात शेतकऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे़ अचानक आलेल्या वादळामुळे गोंधळल्याने एका झोपडीचा आधार घेणाऱ्या सहा शेतकऱ्यांचा झोपडीवरच वीज पडून दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वडगाव शेतशिवारात घडली. तर नागपुरातील नरखेड येथेही वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री दोघांचा मृत्यू झाला़ गडचांदूर येथील दुर्घटनेतील मृतांमध्ये केशव चव्हाण (४५), चंदू आस्वले (३२), पकंज हस्ते (२२), राजू गेडाम (३५), भाऊराव पेंदोर (४०), बापूराव पेंदोर (५०) यांचा समावेश आहे़ घटनेनंतर दोन तासांपर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनीच जखमींना बैलबंडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम) शिवारात शेतात काम करणाऱ्या विश्वेश्वर वैद्य (५०) यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. मुक्ताईनगर तालुक्यात विक्रम नारायण डहाके (४५) हे आणि भुसावळ तालुक्यातील संजय अरुण पवार (२७) अशी मृतांची नावे आहेत. दुसरीकडे साकेगाव (ता. भुसावळ) येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरच वीज कोसळली. (लोकत न्यूज नेटवर्क)