शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

वीज कोसळून नऊ ठार

By admin | Updated: June 12, 2015 03:54 IST

राज्यात वीज कोसळून गेल्या चोवीस तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये विदर्भातील सात शेतकऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे़

नागपूर/जळगाव : राज्यात वीज कोसळून गेल्या चोवीस तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये विदर्भातील सात शेतकऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे़ अचानक आलेल्या वादळामुळे गोंधळल्याने एका झोपडीचा आधार घेणाऱ्या सहा शेतकऱ्यांचा झोपडीवरच वीज पडून दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वडगाव शेतशिवारात घडली. तर नागपुरातील नरखेड येथेही वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री दोघांचा मृत्यू झाला़ गडचांदूर येथील दुर्घटनेतील मृतांमध्ये केशव चव्हाण (४५), चंदू आस्वले (३२), पकंज हस्ते (२२), राजू गेडाम (३५), भाऊराव पेंदोर (४०), बापूराव पेंदोर (५०) यांचा समावेश आहे़ घटनेनंतर दोन तासांपर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनीच जखमींना बैलबंडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम) शिवारात शेतात काम करणाऱ्या विश्वेश्वर वैद्य (५०) यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. मुक्ताईनगर तालुक्यात विक्रम नारायण डहाके (४५) हे आणि भुसावळ तालुक्यातील संजय अरुण पवार (२७) अशी मृतांची नावे आहेत. दुसरीकडे साकेगाव (ता. भुसावळ) येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरच वीज कोसळली. (लोकत न्यूज नेटवर्क)