शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सत्तारांनी कॅबिनेटपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष द्यावे: निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 14:48 IST

ज्या मराठवाड्यातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, त्याच मराठवाड्यात गेल्या महिन्याभरात 120 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर याच मुद्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.

ज्या मराठवाड्यातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, त्याच मराठवाड्यात गेल्या महिन्याभरात 120 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असताना मात्र अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही म्हणून राजीनामा दिला. तर बंगले, मंत्रीपद आणि सत्ता यात मग्न असलेल्या ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

तर पसंतीचा बंगला मिळावा यासाठी नेत्यांमध्ये सुरु असलेल्या चढाओढीच्या मुद्यावरून सुद्धा त्यांनी सरकावर टीका केली. 'ह्या नंतर योग्य अधिकारी नाही, आमच्या फाईलवर लवकर सही होत नाही, आमच्यावर अन्याय होतोय, आमच्या नेत्याचा अपमान केला जात आहे'. अशा मुद्यांसाठी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करणे शिल्लक राहिले असल्याची टीका त्यांनी केली.