शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

गोऱ्हेंचे ‘ते’ विधान मूर्खपणाचे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:12 IST

कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिंदेसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले विधान मूर्खपणाचे होते, त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन फटकारले. 

कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे. गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केले, त्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये आल्या. नंतर त्या ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेसेनेत काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत त्यांनी चार पक्ष बदलले. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असे भाष्य करायला नको होते, असा टोला पवार यांनी लगावला.

उद्धवसेनेचा टोला तर शिंदेसेनेकडून पाठराखण उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारीही गोऱ्हे यांचा अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला. ज्या सोन्याच्या ताटात खाल्ले, त्यातच घाण करून गेल्या, असे राऊत म्हणाले....तर हा महिलांचा अपमान असून, त्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत, हे आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही बोललो तर इज्जत जाईल, असा इशारा देत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी गोऱ्हे यांची पाठराखण केली.

राऊत म्हणाले ते बरोबरचसाहित्य संमेलनाच्या मंचावरून झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत. त्यामुळे पवारांनी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करावा, अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली होती.त्यावर बोलताना पवार म्हणाले, राऊत म्हणाले ते १०० टक्के बरोबर आहे. मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. मात्र, साहित्य संमेलनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय, हा आरोप खरा नाही.

नैतिकता आणि मंत्र्यांचा काही संबंध नाहीबीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर ग्रामस्थांच्या आणि राज्यातील लोकांच्या तीव्र भावना पाहिल्यानंतर स्वाभिमान असणारी कुणीही व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही.यापूर्वी काही मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना पद सोडावे लागले आणि चौकशी झाली होती. परंतु, सध्या आरोप होत असलेल्या मंत्र्यांचा आणि नैतिकतेचा काही संबंध असल्याचे जाणवत नाही, असा टोला पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना लगावला.

त्या काय म्हणाल्या होत्या?साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते, असा आरोप केला होता. 

बोलताना मर्यादा पाळा प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNeelam gorheनीलम गो-हे