शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गोऱ्हेंचे ‘ते’ विधान मूर्खपणाचे; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या विधानावर शरद पवार यांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:12 IST

कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिंदेसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले विधान मूर्खपणाचे होते, त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन फटकारले. 

कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना आमदारकीच्या चार टर्म कशा मिळाल्या, हे सर्वांनाच माहिती आहे. गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केले, त्यानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये आल्या. नंतर त्या ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेसेनेत काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत त्यांनी चार पक्ष बदलले. हा अनुभव लक्षात घेता त्यांनी असे भाष्य करायला नको होते, असा टोला पवार यांनी लगावला.

उद्धवसेनेचा टोला तर शिंदेसेनेकडून पाठराखण उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारीही गोऱ्हे यांचा अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला. ज्या सोन्याच्या ताटात खाल्ले, त्यातच घाण करून गेल्या, असे राऊत म्हणाले....तर हा महिलांचा अपमान असून, त्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत, हे आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही बोललो तर इज्जत जाईल, असा इशारा देत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी गोऱ्हे यांची पाठराखण केली.

राऊत म्हणाले ते बरोबरचसाहित्य संमेलनाच्या मंचावरून झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार आहेत. त्यामुळे पवारांनी गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करावा, अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली होती.त्यावर बोलताना पवार म्हणाले, राऊत म्हणाले ते १०० टक्के बरोबर आहे. मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. मात्र, साहित्य संमेलनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय, हा आरोप खरा नाही.

नैतिकता आणि मंत्र्यांचा काही संबंध नाहीबीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर ग्रामस्थांच्या आणि राज्यातील लोकांच्या तीव्र भावना पाहिल्यानंतर स्वाभिमान असणारी कुणीही व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही.यापूर्वी काही मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांना पद सोडावे लागले आणि चौकशी झाली होती. परंतु, सध्या आरोप होत असलेल्या मंत्र्यांचा आणि नैतिकतेचा काही संबंध असल्याचे जाणवत नाही, असा टोला पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना लगावला.

त्या काय म्हणाल्या होत्या?साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते, असा आरोप केला होता. 

बोलताना मर्यादा पाळा प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळायला हव्यात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNeelam gorheनीलम गो-हे