शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विश्रांतीनंतर रात्री कोसळधारा

By admin | Updated: September 24, 2016 01:41 IST

सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी अखेर मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांती घेतल्याने बेजार झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

मुंबई : गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी अखेर मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांती घेतल्याने बेजार झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. असे असले तरीही शनिवारी आणि रविवारी शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, काहीसा दिलासा मिळालेल्या मुंबईकरांना आणखी काही दिवस पावसाचा जाच सहन करावा लागणार आहे. दरम्यान, दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा पावसाने सर्वत्र मुसळधार हजेरी लावली. मध्य मुंबईसह परेल, गोरेगाव आणि मालाडमधील परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. ऐनवेळी दाखल झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांची मात्र तारांबळ उडाली.मध्य भारत, पश्चिम बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मागील आठवड्याभरापासून राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतही सलग आठ दिवसांपासून सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, पावसामुळे मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. गुरुवारी रात्री जोर धरलेल्या पावसाने रात्रभर मारा केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर मात्र विश्रांती घेतली. शहरासह उपनगरात पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत झालेल्या पावसामुळे शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ५ ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. शहरात ४, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ३, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण १० ठिकाणी झाडे पडली. (प्रतिनिधी)२४ तासांचा पाऊस (मिमी)कुलाबा ४५.२सांताक्रुझ ३९.७२२ सप्टेंबरपर्यंतचा पाऊस (मिमी)कुलाबा २३२४सांताक्रुझ २७९१वार्षिक सरासरीकुलाबा २१८४सांताक्रुझ २४५३पावसाची टक्केवारीकुलाबा १०६.४१सांताक्रुझ ११३.८१